शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ठाणे, पालघरच्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करा; सर्वसाधारण सभेत उमटले पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 3:38 AM

न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या

ठाणे : न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या. सुमारे चार महिने होऊनही हे शिक्षक त्या त्या जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये हजर झालेले नाहीत. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे.ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाहीत, पालघरचेही ठाण्यात आले नाहीत. मात्र, काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्यांचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केली.शिक्षकांच्या बदल्यांच्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षण विभाग मात्र त्याविरोधात मूग गिळून आहे. यात मात्र गावखेड्यातील गरीब, कष्टकरी, शेतकºयांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास विलंब करणाºया या शिक्षकांवर कडक कारवाईची मागणीदेखील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले. शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील शिक्षक संबंधित शाळांवर हजर न झाल्यामुळे त्यांच्याकडून न्यायालयीन आदेशाचे उलंघन झाले. याविरोधात हजर झालेले शिक्षक मात्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारी आहेत.शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसानमुरबाड तालुक्यात एक शिक्षक व तीन केंद्र प्रमुख हजर झाले नाहीत. त्यांना या तालुक्यात यायचे नसल्यामुळे त्यांनी येण्यास नकार दिला. अंशकालीन बदल्यांच्या नावाखाली या केंद्रप्रमुखांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांनी व्यक्त केली. या केंद्रप्रमुखांमुळे मुरबाड पंचायत समितीच्या नियंत्रणातील टोकावडे, माळ व किशोर केंद्रांतील सुमारे ६० शाळांवरील नियंत्रणाची समस्या उद्भवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळा