शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

मिठाई दुकानांनी नियम बसवला धाब्यावर तर काहींनी केलं नियमांचं पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 4:15 PM

Sweet Shop Mithai : मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे

कुलदीप घायवट

कल्याण - आता नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त मोठ्याप्रमाणात मिठाईची खरेदी ग्राहकांकडून केली जाते.  मात्र ग्राहकांना विकत घेतलेली मिठाई किती कालावधीपर्यंत खाता येईल, याची माहिती मिळत नाही. यासाठी मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मिठाई दुकानदारांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. महापालिका क्षेत्रातील ७ दुकानांची पाहणी केली असता, फक्त दोन नामांकित मिठाई दुकानदारांनी नियमांची अंमलबजावणी केली असल्याचे दिसून आले. 

अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याचे बंधनकारक केले आहे. विक्रेत्यांना या नियमांचे पालन न  केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र कल्याण येथील रामबाग, संतोषी माता रोड, गौशाळा रोड येथील दुकानांची पाहणी केली असता, कोणत्याही विक्रेत्याने नियमांचे पालन केले नाही. तर, डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड आणि कल्याण रेल्वे स्थानक रोड येथील झुंजारराव नगर येथील नामांकित मिठाई विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन केले जात आहे. याबाबत ग्राहकांमध्येही जागृती आहे. या नवीन पध्दतीचे ग्राहकांकडून स्वागत केले जात आहे. सध्या बाजारातील रेलचेल कमी आहे. असे, मिठाई विक्रेते श्रीपाद कुळकर्णी म्हणाले.

खूप चांगला नियम शासनाने सुरू केला आहे. यामुळे दुकानदारांकडून होणारी फसवणूक कमी होईल. शिळी मिठाई खाऊन विषबाधा होणाऱ्या घटनेवर लगाम लागेल, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. दरम्यान, लाडूसारखी मिठाई तीन-चार दिवस टिकते. मग दोनच दिवस त्याची बेस्ट बिफॉर का आहे. काहीवेळा बाहेरगावी जाताना, नातेवाईकांना मिठाई घेऊन जाताना आदल्या दिवशी खरेदी केली जाते. त्यानंतर इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मिठाई बेस्ट बिफॉरची तारीख निघून जाते, मग ती मिठाई शिळी होईल का, असे प्रश्न ग्राहकांच्या ग्राहकांच्या मनात तयार झाले आहेत. 

शासनाकडून, अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या नियमाचे त्वरित पालन केले. सर्व मिठाईच्या ट्रे समोर बेस्ट बिफॉर याची माहिती लिहिली आहे. ग्राहक मिठाई खरेदी करताना, खाताना नेहमी जागृत असतात. काही ग्राहक यासंदर्भात अनभिज्ञ असतात. ग्राहकांनी सजग राहून दुधाची मिठाई २४ तास तर, लाडू, मोतीचूर यांसारखी मिठाई ४८ तासांच्या आत खावी.

- भूषण गवळी, मिठाई विक्रेते 

.कल्याण, डोंबिवली येथील आठ दुकानांची पाहणी केली असता, येथील दुकानांदारांनी नियमांचे पालन केल्याचे आढळून आले. व्यापारी संघटनेशी संपर्क साधून नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत जागृत करत आहोत.

- धनंजय काडगे, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, कल्याण 

टॅग्स :foodअन्नkalyanकल्याण