शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

ठाण्यातील आमदारांची मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 06:29 IST

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

ठाणे : सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, अद्यापही खातेवाटपावरुन गुºहाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. १८आमदारांच्या जिल्ह्यात सध्या ९ भाजप, ५ शिवसेना, २ राष्ट्रवादी, १ मनसे, समाजवादी १ अपक्ष आमदार आहेत. त्यानुसार आता शिवसेनेतील पाच पैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

परंतु, सर्वांच्या मर्जीखातीर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू असल्याने महत्त्वाच्या खात्यांचीही अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदेच्या वाटेला कोणते खाते येणार याकडे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कायम राहिल, असे बोलले जात आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम, किंवा आरोग्य खातेही त्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे सर्वाधिक मतांनी निवडून येणारे आणि हॅट्रिक साधणारे प्रताप सरनाईक हेदेखील मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. त्यांना कॅबिनेट नाही निदान राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांनीही आता मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात आहेत, त्यामुळे फाटकांवर कृपा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचीही राज्यमंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

तिकडे मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी आव्हाड यांची पोस्ट सध्या फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील इतर आमदारांनी मात्र या सर्वांतून काहीशी माघार घेतल्याचेच दिसत आहे. असे असले तरी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना