शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

चार तालुक्यांमध्ये गंभीर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 2:01 AM

धोरणात्मक निर्णयाची मागणी : जलस्राेतांवर बंधारे बांधण्याची आवश्यकता

- राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा या तालुक्यांतील शेकडो गाव-पाड्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोखाडा, जव्हार या भागांत आतापासूनच टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. दरवर्षी या तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा हे तालुके डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारीनंतर या पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. मोखाडा तालुक्यात आसे गावातील दापडी एक व दोन या पाड्यांसाठी पाणी टँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केलेला आहे, तर जुने जव्हार भागातील काळीधोंड या गावासाठीही एका टँकरचा प्रस्ताव पाठवलेला आहे. फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी सुमारे ९३ गावपाड्यांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. माेखाडा तालुक्यातील देवबांध, निळमाती, आसे, शास्त्रीनगर व धामणीच्या मागे नदी व नाले यांचे चांगले पाणी स्राेत आहेत. तेथे बंधारे बांधून पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास येथील टंचाई दूर होईल, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, या तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींचा मोठा अभाव दिसत आहे. राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन  नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई