शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या आगारांची सुरक्षा सुविधांअभावी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील ...

डोंबिवली : केडीएमटी उपक्रमाचे प्रमुख संचलन चालणाऱ्या गणेशघाट आगारातील संरक्षक भिंती कोसळल्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आली असताना वसंत व्हॅलीतील स्व. बाळासाहेब ठाकरे आगार आणि डोंबिवलीतील खंबाळपाडा आगाराची स्थिती फारशी वेगळी नाही. या आगारांकडे पूर्णत: कानाडोळा झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडूनही तेथे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुविधांअभावी सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

खंबाळपाडा परिसरात केडीएमटीच्या आगारासाठी आरक्षित जागा आहे. तेथे केडीएमटीच्या बस उभ्या करण्याचे आणि डिझेल पंप उभारण्याचे प्रस्तावित होते. डोंबिवलीतील बसचे संचलन या आगारातून करण्याचे नियोजनही करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु या जागेवर काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोठ्या आरसी आणि घंटागाड्या, अशा २०० हून अधिक कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. कल्याण पूर्वेतील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या, डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या येथे उभ्या केल्या जातात.

दरम्यान, आगारात पुरेसे विद्युत दिवे नाहीत. प्रवेशद्वारावरच केवळ बल्ब लावला आहे. त्यात आगारातील बहुतांश ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याने सुरक्षा राखणे येथील सुरक्षारक्षकांना जिकिरीचे होऊन बसते. याठिकाणी प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने सुरक्षारक्षकांसह कचऱ्याच्या गाड्यांवरील चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कार्यशाळेसाठीदेखील सुसज्ज कार्यालय नसल्याने उघड्यावर गाड्या दुरुस्त कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम करताना तारेवरची कसरत कामगारांना करावी लागत आहे.

------------------------------------------------

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराचीही दुरवस्था

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आगाराकडेही प्रशासनाकडे दुर्लक्ष झाल्याने आगार दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. परिवहन उपक्रमात बस वाढत असताना या आगारातून बसचे संचलन व्हावे, यासाठी हा आगार बांधण्यात आला; परंतु मूळ उद्देशाचा प्रशासनाला विसर पडला आहे. याठिकाणी भंगार अवस्थेतील बस उभ्या करण्यात आल्या आहेत, तसेच आगारात रानही मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यात सापांचा वावर वाढल्याने येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-----------------------