शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते विकासाचा मार्ग अखेर झाला मोकळा

By admin | Updated: March 24, 2017 01:04 IST

केडीएमसीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या महासभेत सादर केलेल्या ४२० कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला तत्कालीन स्थायी

कल्याण : केडीएमसीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या महासभेत सादर केलेल्या ४२० कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला तत्कालीन स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. परिणामी, रस्ते विकासाच्या कामांना पुरती खीळ बसली होती. परंतु, आता या प्रस्तावाला दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. सरकारच्या नगरविकास विभागाने तसे पत्र आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठवले आहे. स्थगिती उठल्यामुळे एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यानुसार, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि चौकांचे सुशोभीकरण करण्याची योजना आयुक्त रवींद्रन यांनी आखली आहे. शहरांचे झपाट्याने होणारे शहरीकरण, परिणामी होणारी वाहतूककोंडी यावर उपाय म्हणून पाच वर्षांत शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत अशा एकूण ८७ रस्त्यांच्या केल्या जाणाऱ्या या विकासकामांसाठी ४२० कोटींचा प्रस्ताव रवींद्रन यांनी सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी दाखल केला होता. हे रस्ते पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तत्कालीन सभापती गायकर यांनी या प्रस्तावाची गंभीर दखल घेतली. अंदाजपत्रकात तरतूद नसताना सादर केलेल्या प्रस्तावाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत या प्रस्तावाला नगरविकास विभागाने स्थगिती दिली होती. ४२० कोटींच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामधील बेबनाव समोर आला होता. या सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात रस्ते विकासाच्या कामांना खोडा बसल्याने बहुतांश नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, स्थगिती उठवावी, यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सरकारदरबारी पाच स्मरणपत्रे पाठवली होती. त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही स्थगिती उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली होती. अखेर, सहा महिन्यांनंतर का होईना, केडीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ४२० कोटी रुपयांच्या संबंधित रस्ते विकास प्रकल्पाच्या प्रस्तावाला दिलेली स्थगिती उठवली आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी श्रीकांत जांभवडेकर यांनी स्थगिती उठवल्याबाबतचे पत्र आयुक्त रवींद्रन यांना पाठवले. (प्रतिनिधी)