शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 3:35 PM

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.

ठळक मुद्देवांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.

अंबरनाथ - तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्‍याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता, हे धरण रेल्‍वे प्रशासनाच्या अखत्‍यारीत येत असल्‍याने नागरिकांनी याविषयी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांना व रहिवाशांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी संरक्षण भिंतीला तडे गेल्‍याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सध्या आजुबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरुन शहरांना मोठा घोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरणRainपाऊसrailwayरेल्वे