शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

रिंगरोडबाधितांची मनसे आमदाराकडे धाव; न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:35 AM

घरे देण्याची मागणी, दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या दरम्यान चौथा ते सातवा टप्पा असून, त्यात अटाळी, आंबिवली, वडवली या परिसरांतील ८०० पेक्षा जास्त नागरिकांची घरे बाधित होत आहेत.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पात अटाळी-वडवली परिसरातील ८०० पेक्षा जास्त जणांची घरे बाधित होत आहेत. त्यामुळे या प्रकल्पबाधितांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. बाधितांना घरे मिळावीत, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली आहे.

मोठागाव ठाकुर्ली ते टिटवाळा असा ३१ किलोमीटरचा रिंगरोड प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामाचे सात टप्पे आहेत. त्यापैकी सध्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यांचे काम सुरू झालेले आहे. अन्य टप्प्यांची कामे सुरू झालेली नाहीत. दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या दरम्यान चौथा ते सातवा टप्पा असून, त्यात अटाळी, आंबिवली, वडवली या परिसरांतील ८०० पेक्षा जास्त नागरिकांची घरे बाधित होत आहेत. या टप्प्यांतील रिंगरोडच्या कामासाठी ८० टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित २० टक्के भूसंपादन बाकी आहे. नुकतीच प्रकल्पाची आढावा बैठक मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली. त्यावेळी प्रकल्पबाधितांची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले होते. ही सुनावणी प्रभाग अधिकारी स्तरावर होणार होती. मात्र, ती अद्याप झालेली नाही. प्रकल्पबाधितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान प्रकल्पबाधितांचे म्हणणो पाटील यांनी ऐकून घेतले. या प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे.

आठवले यांनी आदेश देऊनही तोडगा नाही प्रकल्पबाधितांच्या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सहा महिने आधी मुंबईत एक बैठक बोलावली होती.  त्यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या चर्चेच्या वेळी प्रकल्पबाधितांचे नुकसान होणार नाही, यावर तोडगा काढावा, असे आदेश आठवले यांनी दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशानंतरही काहीच न झाल्याने प्रकल्पबाधितांनी मनसे आमदारांकडे धाव घेतली आहे. 

टॅग्स :MNSमनसे