शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या पाणी ...

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला मात्र पाणी खरेदी आणि इतर खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका ज्या ज्या प्राधिकरणांकडून पाणी विकत घेत आहे, त्यांनी मागील काही वर्षांत पाण्याचे दर वाढविल्याने खरेदीपोटी पालिकेला वर्षाला २२५ कोटींच्या आसपास खर्च करावा लागत आहे. देखभाल दुरुस्ती, विजेवर होणारा खर्चदेखील २० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे जवळजवळ २४५ कोटींचा वार्षिक खर्च पाणी पुरवठा विभागाला सहन करावा लागत असताना उत्पन्न मात्र १५० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पालिकेला २०२०-२१ मध्ये उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ७५.४८ कोटींच्या वाढीव खर्चाचा भार सोसावा लागला आहे.

मागील काही वर्षांत पाणी खरेदीवर पालिकेचा अधिकचा खर्च होत आहे. याशिवाय विविध प्राधिकरणाकडून वारंवार पाणी खरेदीचे दर वाढविण्यात येत असल्याने पाणी पुरवठा विभागाला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा तीन वर्षांचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये १२३.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते; परंतु खर्च हा १८९.९६ कोटींचा झाला होता. हा फरक ६६.६० कोटींचा होता. २०१९-२० मध्ये उत्पन्न १३१.१८ कोटींचे असताना खर्च मात्र १९५.५८ कोटींचा झाला होता. यातील फरक हा ६४.४० कोटींचा दिसून आला. २०२०-२१ मध्ये १४९.७५ कोटींचे उत्पन्न असताना खर्च मात्र २२५.२३ कोटींचा झाल्याचे दिसून आले आहे. हा फरक ७५.४८ कोटी एवढा आहे.

पाणी खरेदीसाठी वर्षाला १३० कोटींचा खर्च

एमआयडीसी, मुंबई महापालिका, स्टेम, भातसा आदींकडून महापालिका पाणी खरेदी करीत आहे. यासाठी १०२ कोटींची तरतूद केली असतानाही त्यासाठी १२९ कोटी ३५ लाख ११ हजार १७२ रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये स्टेमला वार्षिक - ४३ कोटी ९० लाख ६४ हजार ३९७ रुपये, स्टेमला ४४ कोटी ३१ लाख २७ हजार ४९८ रुपये, भातसाला ८ कोटी ८१ लाख २ हजार ७७१ रुपये आणि मुंबई महापालिकेला ३२ कोटी ३२ लाख १६ हजार ५०६ रुपये वार्षिक मोजले जात आहेत.

विजेचा खर्च वाढला

पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी पुरवठ्यावर विजेचादेखील खर्च होत आहे. दरवर्षी या खर्चातदेखील वाढ होत आहे. २०१८-१९ रोजी ३४.७२ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर २०१९-२० मध्ये हा खर्च ३७.०३ कोटी आणि २०२०-२१ मध्ये हा खर्च ३८.०१ कोटी एवढा झाला आहे.

पाणी खरेदीचे दर वाढले

ठाणे महापालिका विविध प्राधिकरणाकडून पाणी उचलत आहे; परंतु मुंबई महापालिकेने पाण्याचे दर वाढविल्याने त्याचा फटका पालिकेला सहन करावा लागत आहे.

प्राधिकरणाचे नाव - दशलक्ष - पूर्वीचे दर - आताचे दर

भातसा - २०० - ५.५० रुपये - ५.५० रुपये

स्टेम - ११० - १०.३० - १०.५०

एमआयडीसी - ११० - ९ रुपये - ९ रुपये

मुंबई महापालिका - ६५ - ८ रुपये - १२.३० रुपये

पाणी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी मागील वर्षी पाणी दरवाढीचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला होता; परंतु त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. मीटरद्वारे पाणी देणाऱ्यांकडून १ हजार लीटरमागे १३ रुपये आकारण्याचा हा प्रस्ताव होता; परंतु त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा दर हजार लीटरमागे आजही ७.५० रुपये एवढाच आहे. त्यामुळे किमान हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी याची मदत झाली असती, असेही सांगण्यात येत आहे.

............