शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 17:10 IST

मुग्धा चिटणीस-घोडके कला-सांस्कृतिक प्रतिष्ठान, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

ठळक मुद्देकथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ग्रंथ प्रकाशन सोहळापारितोषिक वितरण समारंभ डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

ठाणे ः कथाकथनकार आणि चित्रपट नायिका दिवंगत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या स्मृत्यर्थ झालेल्या आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याच समारंभप्रसंगी व्यास क्रिएशन्सतर्फे अशोक चिटणीस लिखित ‘साप आणि शिडी’ या कथासंग्रहाची चौथी आवृत्ती आणि डॉ. शुभा चिटणीस लिखित महाराष्ट्रातील 16 वृद्धाश्रमांचा परिचय करून देणार्‍या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.         कथाकथन स्पर्धेतीलतत शालेय गटात ठाण्यातील ए. के. जोशी स्कूलच्या आबोली शिंदे हिला रु. 1000/- चे पहिले पारितोषिक, एस.व्ही.पी.टी.च्या अनन्या देसवंडीकर हिला रु. 750/- चे दुसरे पारितोषिक आणि डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलच्या रिया कुलकर्णी हिला रु.500/- चे तिसरी पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन गटात जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या किमया तेंडुलकर हिला रु.1000/- चे पहिले पारितोषिक, डोंबिवलीच्या प्रगती विद्यालयाच्या यश पवारला रु. 750/- दुसरे पारितोषिक आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या ममता सकपाळला तिसरे पारितोषिक मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक आणि प्रथम क्रमांकांच्या शाळा-महाविद्यालयास कायमस्वरुपी चषक डॉ. विजया वाड, प्रा. अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, डॉ. उदय निरगुडकर, आमदार प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कथाकथन स्पर्धेविषयी आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. प्रा. प्रदिप ढवळ यांनी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन मार्गदर्शन शिबिराची आवश्यकता असल्याचे सांगितले. लेखक, कथाकथनकार, प्राचार्य अशोक चिटणीसांनी मुग्धाच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा आणि कथाकथनकार म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांचा परिश्र, पाठांतर, वक्तृत्त्व, अभिनय आणि कथेची साक्षेपी निवड कशी आवश्यक आहे हे अनुभवातून सांगितले. स्पर्धेच्या परिक्षकांच्या वतीने लेखिका माधवी घारपुरे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. डॉ. शुभा चिटणीस यांनी ‘आनंदसंध्या’च्या लेखनकाळात भेट दिलेल्या विविध वृद्धाश्रमांची वैशिष्ट्ये सांगून वृद्धाश्रमांची आवश्यकता सांगितली. मात्र वृद्धाश्रमांची संख्येतील होणारी वाढ ही समाजाच्या निकोप शरीराच्या दृष्टीने खंत वाटावी अशीच गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रकाशक नीलेश गायकवाड यांनी प्रकाशन व्यवसायाची आजची वास्तवता सांगून लेखक-लेखिकेचा सत्कार व्यास क्रिएशन्स् तर्फे केला. सिने-दिग्दर्शक राजदत्त यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विजया वाड, आमदार प्रताप सरनाईक आणि अभ्यासू पत्रकार, डॉ. उदय निरगुडकर या सर्वांनी मुग्धा, कथाकथन आणि अशोक व डॉ. शुभा चिटणीस यांच्या लेखनशैलीविषयी व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्तवाविषयी आपले विचार रंगतदार, शैलीदार पद्धतीने मांडले. कथाकथन व वृद्धाश्रमासंबंधी डॉ. उदय निरगुडकरांनी अत्यंत अभ्यासूपणे मांडलेले विचार सर्वांना भावले. प्रफुल्ल चिटणीसांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर हा रंगलेला कार्यक्रम विराम पावला.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य