शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

ठाण्यात कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 17:10 IST

मुग्धा चिटणीस-घोडके कला-सांस्कृतिक प्रतिष्ठान, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

ठळक मुद्देकथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ग्रंथ प्रकाशन सोहळापारितोषिक वितरण समारंभ डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

ठाणे ः कथाकथनकार आणि चित्रपट नायिका दिवंगत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या स्मृत्यर्थ झालेल्या आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याच समारंभप्रसंगी व्यास क्रिएशन्सतर्फे अशोक चिटणीस लिखित ‘साप आणि शिडी’ या कथासंग्रहाची चौथी आवृत्ती आणि डॉ. शुभा चिटणीस लिखित महाराष्ट्रातील 16 वृद्धाश्रमांचा परिचय करून देणार्‍या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.         कथाकथन स्पर्धेतीलतत शालेय गटात ठाण्यातील ए. के. जोशी स्कूलच्या आबोली शिंदे हिला रु. 1000/- चे पहिले पारितोषिक, एस.व्ही.पी.टी.च्या अनन्या देसवंडीकर हिला रु. 750/- चे दुसरे पारितोषिक आणि डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलच्या रिया कुलकर्णी हिला रु.500/- चे तिसरी पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन गटात जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या किमया तेंडुलकर हिला रु.1000/- चे पहिले पारितोषिक, डोंबिवलीच्या प्रगती विद्यालयाच्या यश पवारला रु. 750/- दुसरे पारितोषिक आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या ममता सकपाळला तिसरे पारितोषिक मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक आणि प्रथम क्रमांकांच्या शाळा-महाविद्यालयास कायमस्वरुपी चषक डॉ. विजया वाड, प्रा. अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, डॉ. उदय निरगुडकर, आमदार प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कथाकथन स्पर्धेविषयी आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. प्रा. प्रदिप ढवळ यांनी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन मार्गदर्शन शिबिराची आवश्यकता असल्याचे सांगितले. लेखक, कथाकथनकार, प्राचार्य अशोक चिटणीसांनी मुग्धाच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा आणि कथाकथनकार म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांचा परिश्र, पाठांतर, वक्तृत्त्व, अभिनय आणि कथेची साक्षेपी निवड कशी आवश्यक आहे हे अनुभवातून सांगितले. स्पर्धेच्या परिक्षकांच्या वतीने लेखिका माधवी घारपुरे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. डॉ. शुभा चिटणीस यांनी ‘आनंदसंध्या’च्या लेखनकाळात भेट दिलेल्या विविध वृद्धाश्रमांची वैशिष्ट्ये सांगून वृद्धाश्रमांची आवश्यकता सांगितली. मात्र वृद्धाश्रमांची संख्येतील होणारी वाढ ही समाजाच्या निकोप शरीराच्या दृष्टीने खंत वाटावी अशीच गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रकाशक नीलेश गायकवाड यांनी प्रकाशन व्यवसायाची आजची वास्तवता सांगून लेखक-लेखिकेचा सत्कार व्यास क्रिएशन्स् तर्फे केला. सिने-दिग्दर्शक राजदत्त यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विजया वाड, आमदार प्रताप सरनाईक आणि अभ्यासू पत्रकार, डॉ. उदय निरगुडकर या सर्वांनी मुग्धा, कथाकथन आणि अशोक व डॉ. शुभा चिटणीस यांच्या लेखनशैलीविषयी व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्तवाविषयी आपले विचार रंगतदार, शैलीदार पद्धतीने मांडले. कथाकथन व वृद्धाश्रमासंबंधी डॉ. उदय निरगुडकरांनी अत्यंत अभ्यासूपणे मांडलेले विचार सर्वांना भावले. प्रफुल्ल चिटणीसांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर हा रंगलेला कार्यक्रम विराम पावला.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य