शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:46 IST

पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही.

कल्याण  -  पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही.डोंबिवलीतील प्रदूषणाच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांकडून प्रदूषणाविरोधात लढा सुरू आहे. डोंबिवलीत एकदा हिरवा पाऊस पडला होता. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीतून हिरव्या रंगाचा नाला वाहतोय. येथील प्रदूषण नियंत्रणात आलेले नाही, तर ते वाढलेले आहे.प्रदूषणप्रकरणी एमआयडीसीने आपली जबाबदारी झटकत यासाठी कंपन्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीने यावर अजब तोडगा सुचवत, पावसाचे पाणी सांडपाणी केंद्रात सोडू नका, अशी तंबी कंपन्यांना दिली आहे. मात्र, पावसाला अद्याप सुरुवातच झालेली नसताना, एमआयडीसीने दिलेला सल्ला म्हणजे कातडीबचाव धोरणाचाच भाग असल्याची टीका होत आहे. अशा प्रकारे दोषारोप करून प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघूच शकत नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.डोंबिवलीच्या नांदिवली नाल्यातून शनिवारी हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. त्याचा त्रास रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना झाला. नागरिकांनी याविषयी तक्रार केली आहे. २०१४ मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याने प्रदूषणाचा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर, प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळासह सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने नाल्यातून रसायनमिश्रित हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. ही केवळ एक दिवसाची तक्रार नाही. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कारखान्यांतून सांडपाण्यावर योग्य निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने वनशक्ती या पर्यावरण संस्थेने दाखल केलेला हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदूषण रोखण्याचा दावा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. डोंबिवलीतील रासायनिक व कापड उद्योग प्रक्रियेतून प्रक्रियेपश्चात निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या आहेत. या वाहिन्यांचे चेंबर ओव्हरफ्लो होतात. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाच्या पाहणीत रासायनिक सांडपाणी वाहून नेण्याºया वाहिन्यांचे चेंबर्स ओव्हरफ्लो होत असल्याप्रकरणी एमआयडीसीला जाब विचारला असता एमआयडीसीने याप्रकरणी सर्व कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.नोटीसमध्ये एमआयडीसीने म्हटले आहे की, नाल्यात कापड, धागे, प्लास्टिक अडकून चेंबर्स ओव्हरफ्लो होत आहेत. त्याचबरोबर केवळ रासायनिक सांडपाणी या वाहिन्यांद्वारे न सोडता त्याद्वारे पावसाचे पाणी सोडले जात असल्याने चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी नाल्यात जाऊन मिसळते. पावसाचे सांडपाणी एका स्वतंत्र वाहिनीद्वारे नाल्यात न सोडल्यास कारखाने बंद करण्याची तंबीही देण्यात आली आहे.जबाबदारी झटकून कंपन्यांकडे बोट दाखवत केला बचावडोंबिवली एमआयडीसीतील फेज नंबर-२ मधील रासायनिक सांडपाणी केंद्र हे १.५ दक्षलक्ष लीटर क्षमतेचे आहे. त्यांचे अपग्रेडेशन केल्याप्रकरणी जागतिक पर्यावरणदिनी वसुंधरा पुरस्काराने या केंद्राला सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरवले आहे. तरीदेखील नाल्यात प्रक्रियेविना रासायनिक सांडपाणी सोडले जात असेल, तर अपग्रेडेशन कशाचे केले आणि पुरस्कार कशाच्या आधारे दिला गेला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.वाहिन्या व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती एमआयडीसीने करणे अपेक्षित आहे. मात्र जबाबदारी झटकत कंपन्यांकडे बोट दाखवून मंडळाच्या भरारी पथकाच्या कारवाईतून बचावासाठी एमआयडीसीने नोटीस पाठवल्यात. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाpollutionप्रदूषण