शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - ग्वाल्हेरचे शिंदे घराणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:10 IST

शिवविचारांचे पाईक असणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला भल्याभल्यांना अवघड गेलं, त्याचं कारण बाजीरावांनी हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ.

- प्रशांत सुमती भालचंद्र ठोसरशिवविचारांचे पाईक असणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला भल्याभल्यांना अवघड गेलं, त्याचं कारण बाजीरावांनी हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ.हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे कालवश झाले होते. छत्रपती शाहू महाराजांचा अंमल सुरू झालेला होता. वारसाहक्काने कोणती गादी मानायची, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम पूर्णत: दूर झालेला नव्हता. शाहू महाराजांनी प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून आधी बाळाजीपंत विश्वनाथ भट व त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव यांना पंतप्रधान पेशवाईची जबाबदारी सोपवली होती. बाळाजी विश्वनाथ व आता थोरले बाजीराव हे सक्षमपणे शिवसैन्याचा डंका उत्तरेकडे समशेरी रोखून धाडसाने व अजिंक्य विश्वासाने वाजवत होते. भलेभले सरदार, राजे, निजाम हे बाजीरावांची रणनीती ओळखण्यात चुकत होते. बाजीरावांचा झंझावात रोखणे, हे त्यांना जवळपास अशक्यच वाटत होते.थोरल्या बाजीरावांनी दूरदृष्टीने एकेक करत आपले बलवत्तर मोहरे मध्य हिंदुस्थानच्या पटावर ठेवायला सुरुवातही केली. यांच्यापैकी एक तालेवार घराणे होते, शिंदे यांचे. या घराण्याचे मूळ पुरुष होते, राणोजीराव शिंदे. हे महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील कण्हेरखेडा येथील ‘पाटील’. यांचे अत्यंत विश्वासू वर्तन बघून बाजीरावांनी यांना समृद्ध माळवा प्रांतात छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने चौथाई वसुलीसाठी (उत्पन्नाच्या २५ टक्के कर) नामजाद केले व सरदेशमुखीचे हक्कही प्रदान केले. राणोजीरावांनी आता मध्य हिंदुस्थानात उज्जैन येथे आपले बस्तान बसवले व कालांतराने तेच शिंदे संस्थानिकांचे राजधानीचे ठिकाण गणले जाऊ लागले. पेशव्यांचे पर्यायाने शाहू छत्रपतींचे निष्ठावान असणारे राणोजीराव शिंदे बाजीरावांच्या १७४० मधील अकाली मृत्यूनंतर १७४५ मध्ये मरण पावले. त्यांच्या पश्चात जयाप्पाराव, दत्ताजीराव, ज्योतिबाराव व तुकोजीराव तसेच महादजीराव असे पुत्र होते. जयाप्पाराव आता शिंदेशाहीचे वारसदार म्हणून कारभार बघू लागले. त्यासमयी त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६५ लाख रुपये इतके होते. जयाप्पाराव इ.स. १७५६ मध्ये नागौर येथे मारले गेले. त्यांना मुलगा होता, त्याचे नाव जनकोजी. पण, राज्यकारभार मात्र बंधू दत्ताजीरावच बघत होते. दुर्दैवाने दत्ताजीराव शिंदे पानिपतच्या समरप्रसंगी अब्दालीकडून ऐन युद्धात वीरगती प्राप्त करते झाले. अब्दालीने जबर जखमी झालेल्या दत्ताजीरावला कुत्सितपणे विचारले, ‘क्यों पटेल, और लडोगे क्या ? मृत्यू समोर असतानाही दत्ताजी बाणेदारपणे त्यास म्हणाला, ‘ हाँ, बचेंगे तो और भी लडेंगे.’ इतिहासात हे उद्गार अजरामर झाले आहेत. अर्थातच, दत्ताजीराव ताबडतोब मारले गेले. जनकोजीराव शिंदेदेखील पानिपतच्या १७६१ मधील युद्धात बंदी होऊन अखेर मारले गेले. आता पानिपतच्या लढाईत वाचलेल्या महादजीराव शिंद्यांवर ग्वाल्हेर संस्थानाची धुरा येऊन पडली. ग्वाल्हेर संस्थानचा इतिहास तसेच पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा या कर्तृत्ववान महादजीराव शिंदे यांच्या योगदानाचा यथोचित आढावा घेतल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असे म्हटले तर ते गैरलागू ठरू नये.महादजीराव पानिपतच्या नंतर महाराष्ट्रात परतले व आपले स्थान भक्कम करून पुनश्च १७६४ मध्ये माळव्यात आले. महादजीराव व त्यांच्या दीर्घ कारकिर्दीनंतर शिंदे घराण्यातील राजांनी आपापली अनेक वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडली. सोन्याच्या मोहरा, चांदीचे रुपये, तांब्याचे पैसे यांचा समावेश आहे. शिंदे घराण्याची नाणी व टांकसाळी यांची माहिती घेणार आहोत

टॅग्स :Jara hatkeजरा हटके