शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या तुटवड्याने दिला जात आहे केवळ दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:39 IST

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशिल्डच्या केवळ तीन हजार ३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने ...

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेकडे गुरुवारी रात्रीपर्यंत कोविशिल्डच्या केवळ तीन हजार ३४० इतक्याच लस शिल्लक असल्याने शुक्रवारी पालिकेने दुसरा डोस असणाऱ्या केवळ ५०० जणांनाच लस दिली. लस नसल्याने पालिकेने सहा लसीकरण केंद्र तात्पुरती बंद केली असून, केवळ पाच केंद्रच सुरू ठेवली आहेत. लस नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले.

सरकारकडून मीरा- भाईंदर महापालिकेला एक लाख सहा हजार ६२० लसी देण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी पालिकेने स्वतःची ११ लसीकरण केंद्र सुरू केली होती तर खासगी नऊ लसीकरण केंद्र आहेत. पालिकेने जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस लवकर मिळावी म्हणून रोजच्या तीन ते साडेतीन हजार लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट असूनही रोज पाच हजार नागरिकांना लस दिली जात होती. गुरुवारी रात्रीपर्यंत महापालिकेकडे केवळ तीन हजार ३४० लसच शिल्लक राहिल्या. सरकारकडून लस येणे तूर्तास अवघड असल्याने पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चर्चा करून शुक्रवारपासून मीरा रोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन केंद्रातील लसीकरण तापुरते बंद केले.

शुक्रवारपासून भीमसेन जोशी रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्र या पाच ठिकाणीच लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. नव्याने लस देणे बंद केले असून, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनाच दुसरा डोस दिला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर फक्त १०० जणांनाच लस दिली जात आहे. म्हणजेच लसीचा साठा येत नाही तोपर्यंत रोज एकूण ५०० नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. जेणेकरून आज लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्र बंद झाल्याचे तर ज्या पाच ठिकाणी केंद्र सुरू होते तेथे केवळ दुसऱ्या डोसची लस दिली जाणार असल्याचे समजल्यावर संताप व्यक्त होत होता. काही ठिकाणी हुज्जत घातली जात होती. लस नसल्याने अनेक नागरिक रिकाम्या हाताने परत गेले. केवळ १०० जणांनाच लस द्यायची असल्याने दुपारनंतर केंद्रावर शुकशुकाट होता.

--------------------------------

सरकारकडून लसचा पुरवठा सुरू होताच पुन्हा सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाईल. सध्या पाच केंद्रात लसीकरण सुरू आहे. तेथे रोज दुसरा डोस बाकी असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांना लस दिली जात आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. ऑनलाइन नोंदणी करावी. केंद्रात सर्व सुविधा व आवश्यक कर्मचारी तैनात आहेत.

डॉ. अंजली पाटील, लसीकरण अधिकारी