शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एक हजार परवडणारी घरे

By admin | Updated: March 25, 2017 01:24 IST

ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढील तीन महिन्यांत योजनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका या योजनेसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण करणार असून इच्छुकांचे आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे. वर्षभरात किमान एक हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाण्यात सर्वसामान्यांना घरे घेणे अशक्य झाले आहे. घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत प्रकल्पग्रस्त, झोपडीधारकांना प्राधान्यांनी घरे देण्यात येतात. प्रशासनाने किमान दोन लाख परवडणारी घरे बांधण्याचा निश्चय केला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध भूखंड, त्यावर किती इमारती व घरे बांधता येऊ शकतात, या योजनेत कोणाकोणाला सामावून घेता येऊ शकते आदी सर्व बाबींचा आराखडा तीन महिन्यांत सल्लागारांकरवी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे ५५० चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली घरे उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिका विकासकाला भूखंड देणार असून मागणीनुसार त्यांना घरे उपलब्ध करून द्यायची आहेत. जागा विनामूल्य मिळणार असल्याने केवळ बांधकाम खर्च विकासकाला करावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असणार आहेत. साधारण सहा लाखांपासून हा बांधकाम खर्च येणार असून सर्व व्यवहार बँकांमार्फत होणार आहेत. ठाण्यात घर घेण्यासाठी जानेवारी २०१७ पर्यंत ७ हजार अर्ज आॅनलाइन ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर आले आहेत. एप्रिलनंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार आहे. मात्र, ही योजना जास्तीतजास्त ठाणेकरांपर्यंत पोहोचावी व जास्तीतजास्त ठाणेकरांना हक्काचे परवडणारे घर मिळावे, यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. आॅफलाइन नोंदणी करून अर्जही स्वीकारण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.प्रशासनाने बेतावडे, म्हातार्डी येथे सुमारे १ हजार घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. महासभेने त्याला आधीच मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)