शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

येऊरमध्ये माझा कचरा, माझी जबाबदारी मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 2:27 PM

कचरा टाकून निसर्ग प्रदूषित न करण्याचे आवाहन, आतापर्यंत उचलला तीन ट्रक कचरा.

ठळक मुद्देकचरा टाकून निसर्ग प्रदूषित न करण्याचे आवाहन.आतापर्यंत उचलला तीन ट्रक कचरा.

ठाणे : शहरालगत असलेल्या येऊरच्या डोंगराळ भागात जैवविविधता व पश्चिम घाटातील अनेक वनस्पती या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात. परंतु अलीकडच्या काळात येऊरचा परिसर, येथील निसर्ग हा मानवी चुकांमुळे दूषित होत चालला आहे. प्रदूषणापासून येऊरला वाचविण्यासाठी एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समिती यांनी माझा कचरा, माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या मोहीमअंतर्गत आतापर्यंत तीन ट्रक कचरा उचलेला आहे. येऊर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक भाग आहे आणि येऊरचा निसर्ग ही ठाण्याची ओळख आहे. 

परंतु योग्य ती काळजी घेतली तर हा सुंदर निसर्गसौंदर्य आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवू शकू. अन्यथा हा निसर्ग लोप पावत जाईल. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी वाढत असलेले बंगले, हॉटेल यांमुळे कचरा देखील वाढू लागला आहे आणि तो कचरा ओढ्यात फेकून थेट जंगलात जाऊन त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहीचत असल्याचे येऊरचे रहिवाशी आणि एकलव्य क्रीडा मंडळ आणि येऊर संवर्धन समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्च महिन्यापासून त्यांचे सहकारी शिक्षक आणि खेळाडूंच्या मदतीने कचरा उचलण्याची मोहीम हाती घेतली. 

मे महिन्यापर्यंत ते शनिवारी आणि रविवारी ही मोहीम राबवित परंतू पावसाचे दिवस सुरू झाल्याने या मोहिमेला गती यावी म्हणून रोज सकाळी ते कचरा उचलून जंगल प्रदूषणमुक्त ठेवण्याचे काम करीत आहेत. येऊरमध्ये बंगल्यात येणारे लोक, तसेच येऊरला पार्टीला येणारे लोक बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा तसाच फेकून देतात. त्यामुळे दुपटीने कचरा वाढत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने तो तसाच पडून राहतो याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे आपला कचरा ही आपलीच जबाबदारी असल्याची जनजागृती म्हात्रे आणि त्यांची संस्था करीत आहे. पालिका प्रशासनाला सांगून त्यांनी घंटागाडीची वारंवारता देखील वाढवली आहे.

टॅग्स :thaneठाणेpollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र