शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांवर टीका करणार्‍यांनी आपली लायकी तपासावी; राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 20:01 IST

गुवाहाटीजवळचे कामाख्या देवीचे मंदिर हे तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे तिथे गेलेत, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

ठाणे: शिवसेना हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष कसा चालवायचा हे त्यांना माहिती आहे आणि ते सक्षमही आहेत. त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण, आमच्या आदरणीय नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. शरद पवारसाहेबांवर टीका करणार्‍या श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आपली लायकी तपासावी आणि नंतरच टीका करावी, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. 

एकनाथ शिंदे समर्थकांनी आज शक्तिप्रदर्शन केले . यावेळी खा. श्रीकांत शिंदे आणि मा. महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेवर आनंद परांजपे  यांनी आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिले. परांजपे म्हणाले की, खा. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर बेताल आणि बेछूट आरोप केले. खरंतर खा. शिंदे हे अपरिपक्व  आहेत, हे आपणाला माहित होते. पण, त्यांना ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी पूर्ण माहिती नाही, हेदेखील आता त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले, असे परांजपे म्हणाले. 

जिल्ह्याच्या कुठल्याही कमिटीची पूर्तता केली नाही

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या कुठल्याही कमिटीची पूर्तता केली नाही. सातत्याने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचे काम हे पालकमंत्री शिंदे यांनी केले. नरेश म्हस्के म्हणाले की राष्ट्रवादीचे नगरसेवक त्रास द्यायचे. पण, प्रत्येक महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना न बोलू देणे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना न बोलू देणे, विकास कामांमध्ये राजकारण करणे, किंबहुना कोरोनाकाळात लसीकरणातही राजकारण करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लस कमी देणे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारणही म्हस्के यांनी केले. सध्या शिवसेनेत जे चालू आहे. ते मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला त्यातून बाहेर काढतील. शिवसेनेचाच मुख्यमंत्रीच या राज्यामध्ये राहील, याबाबत तीळमात्रही शंका नाही. पण, शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप आपण करू नयेत. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची ती लायकी नाही. आपण आपल्या पक्षात किती निष्ठावंत आहोत,हे दाखवण्याचा केविलवाणा  प्रयत्न म्हस्के करीत आहेत. नारायण राणे हे जेव्हा फुटले तेव्हा हेच म्हस्के सोबत गेले होते. कायमची त्यांची सवय आहे की जे फुटतात त्यांच्याबरोबर जातात आणि नंतर परत पक्षात येतात. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की पवारसाहेबांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. जशास तसे उत्तर दिलं जाईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला.

गुवाहाटीला जाण्यामागे गौड'बंगाल' काय? 

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा, कर्नाटक,  मध्यप्रदेश या राज्यांमध्येही भाजपची सत्ता आहे. पण, एकनाथ शिंदे हे गुवाहाटीलाच का गेले? या मागेही एक कारण आहे. गुवाहाटी जवळच कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तंत्र-मंत्र याच्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ते गुवाहाटीलाच गेले आहेत. हे आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाही समजले आहे, असे सांगून आनंद परांजपे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShrikant Shindeश्रीकांत शिंदेSharad Pawarशरद पवारthaneठाणे