शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ठाण्यात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 03:09 IST

२०० कार्यकर्ते नजरकैदेत : पोलिसांना चकवून दीड हजार जण रेल्वेने रवाना

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याने ठाण्यातून हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होणार होते. परंतु, यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, विविध ठिकाणांवरून सुमारे चार हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले होते. तसेच मुंबईच्या हद्दीवर नाकाबंदीही केली होती. परंतु, राष्टÑवादी कार्यकर्त्यांच्या हे आधीच लक्षात आल्याने सुमारे १५०० कार्यकर्ते सकाळीच रेल्वेने मुंबईला रवाना झाले होते. दुपारनंतर वातावरण निवळल्याने या सर्व कार्यकर्त्यांना नजरकैदेतून सोडून देण्यात आले.काही दिवसांपासून शरद पवार यांच्याविरोधात ईडीकडून दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर स्वत: पवारच शुक्रवारी या कार्यालयात हजेरी लावणार होते. मात्र, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. असे असतानाही ‘या वेळेस आम्हाला माफ करा, तुमचे आम्ही ऐकणार नसून ईडीच्या कार्यालयाजवळ हजर राहू,’ असे टिष्ट्वट राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी सायंकाळी केले होते.यामुळे ईडी कार्यालयाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये आणि सुरक्षेचा उपाय म्हणून ठाणे पोलिसांच्या वतीने पहाटेपासूनच मुंबईच्या दिशेने जाणाºया ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर नाकाबंदी केली होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्टÑवादीच्या ठाणे शहर कार्यालयातून शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांच्यासह १५ ते २० पदाधिकारी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार तेवढ्यात कार्यालयाबाहेरच नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.४० बसची केली होती सोयदुसरीकडे मुंबईसाठी रवाना होण्यासाठी गुरुवारीच राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत शुक्रवारची रणनीती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे शहर, कळवा आणि मुंब्य्रातून तब्बल ४० बस मुंबईला जाणार होत्या. यातून महिला कार्यकर्त्यांसह तब्बल दोन हजार पदाधिकारी मुंबईला रवाना होणार होते. मात्र, कळव्यातील आत्माराम पाटील चौकातच पोलिसांनी या बस पिटाळून लावल्या. तसेच शहरात असलेल्या बसही पिटाळल्या. परंतु, पोलीस अशा पद्धतीने कारवाई करणार हे माहीत असल्यानेच राष्टÑवादीचे सुमारे १५०० तरुण कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने सकाळीच रेल्वेने रवाना झाले होते. दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर ठाणे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडल्याचे दिसून आले. दुसरीकडे नौपाडा, कळवा, कोपरी, मुंब्रा आदींसह इतर पोलीस ठाण्यांतून सुमारे १५० ते २०० पदाधिकाºयांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. अखेर, पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि वातावरण शांत झाल्यानंतर या पदाधिकाºयांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस