शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मीरा-भाईंदर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिवसेनेला धक्का; मेट्रो कारशेडची पुन्हा होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:44 IST

आमच्यामुळे सुनावणी रद्द झाल्याचा गवगवा करणाऱ्या शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या मुर्धा येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यासाठी जमिनी ताब्यात घेण्याबाबत स्थगित केलेली सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा २० एप्रिल रोजी ठेवली आहे. आमच्यामुळे सुनावणी रद्द झाल्याचा गवगवा करणाऱ्या शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

मीरा भाईंदर मेट्रोचे काम एकीकडे वेगाने सुरु असताना दुसरीकडे मेट्रोच्या कारशेड उभारण्यावरून मात्र मोठा तिढा निर्माण झाला आहे . शहरातील नागरिक मेट्रो कधी सुरु होणार याची चातका सारखी वाट बघत असताना दुसरीकडे मुर्धा गावातील जमीन मेट्रो कारशेडला जमीन देण्यास विरोध होत आहे .  

मुर्धा येथील ३२ हेक्टर जमीनीवर मेट्रो कारशेड एमएमआरडीए ने प्रस्तावित करून जमीन अधिग्रहण करण्यासाठी सूचना जारी केली आहे . मेट्रो स्थानक मुर्धा पर्यंत आणून तेथे कारशेड उभारण्यासह भविष्यात मेट्रो पुढे उत्तन पर्यंत नेण्याची चर्चा देखील आहे . दरम्यान मुर्धा येथे मेट्रो कारशेड उभारण्यास मुर्धा सह राई , मोरवा गावातून विरोध होऊन जाहीर सभा घेणे आदी आंदोलन आकाराला येत आहे .  कारशेड विरुद्ध भाजपा , शिवसेना आदी राजकीय पक्ष सुद्धा मैदानात उतरले आहेत . स्थानिक भूमिपुत्र समन्वय समिती सह गाव पंच मंडळांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले असून सरनाईक यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या जागा न घेता अन्य पर्यायी जागांचा विचार करण्याची मागणी अधिवेशनात केली होती .

कारशेडला उभारण्यास विरोध दर्शवणाऱ्या हरकती उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे नोंदवण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने १४ ते १६ मार्च दरम्यान  जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती . परंतु ऐनवेळी प्रशासकीय कारणास्तव सुनावणी स्थगित केल्याचे जिल्हा प्रशासना कडून पत्रा द्वारे सांगण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील यांनी शिवसेना व आमदार सरनाईक यांच्या विरोधामुळे सुनावणी रद्द केल्याचे म्हटले होते. 

परंतु उपजिल्हाधिकारी यांनी येत्या २० एप्रिल रोजी मेट्रो कारशेड जमीन अधिग्रहण करण्या बाबत आलेल्या हरकती - सूचनां वर सुनावणी ठेवली आहे . सुनावणीच्या नोटिसा तलाठी यांच्या मार्फत सर्व हरकतदार , जमीन मालक यांना देण्यास सांगण्यात आले आहे . त्या अनुषंगाने नोटीस बजावल्या गेल्या आहेत . 

२० एप्रिल रोजी कारशेडची सुनावणी ठेवल्याने शिवसेनाला दिलेला धक्का मानला जात आहे . त्यामुळे ह्या प्रकरणी आ. सरनाईक यांनी एमएमआरडीए चे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांना १४ एप्रिल रोजी पत्र पाठवून मेट्रो कारशेड ची सुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे . विधान भवनात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेवर सकारात्मक उत्तर दिलेले असताना मंत्री यांच्या कडे कारशेड बाबत बैठक होऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही तो पर्यंत  सुनावणी रद्द करावी अन्यथा हक्कभंग दाखल  करावा लागेल असा इशारा दिला आहे . 

गेल्या महिन्यात तर सुनावणीला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यावर सुनावणी स्थगित झाल्याचे सांगण्यात आले होते .  भाईंदर वरून ठाण्याला यायचे - जायचे म्हणजे दिवस जातो . वेळ व प्रवासाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सुनावणी भाईंदर मध्येच घ्यावी अशी मागणी भूमिपुत्र समन्वय समिती सह हरकतदार यांनी जिल्हा प्रशासना कडे केली होती . परंतु जिल्हा प्रशासनाने त्या मागणीला अमान्य करत ठाण्यातच सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMetroमेट्रो