शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

महात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 4:40 PM

स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे तिसरे वर्षे होते. 

ठळक मुद्देमहात्मा फुले हे सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते : प्रा. हरी नरकेस्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला संपन्नअश्वत्थामा चिरंजीव आहे, आजही तो आहे : अशोक समेळ

ठाणेमहात्मा फुले हे केवळ एका समाजाची बांधीलकी घेऊन कार्य करणारे नेते नव्हते, सर्व समाजाची बांधीलकी मानणारे नेते होते असा महात्मा फुले यांच्या कार्याचा आलेख सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक, महाराष्ट्र फाऊंडेशन चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते आणि व्यासंगी बहुश्रुत वक्ते प्रा. हरी नरके यांनी श्रोत्यांसमोर उलगडून उभा केला. 

साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने 'स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. प्रा. हरी नरके यांचे  " कमिशनर आणि उद्योगपती महात्मा फुले." या विषयावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांचा समग्र असा कर्तृत्वाचा परिचय त्यांनी करून दिला. फुले हे  स्वतः उद्योगपती होते. मुंबईतमुंबई महानगरपालिका, मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राची इमारत त्यांच्या बांधकाम कंपनीने उभारलेल्या आहेत. पुण्यात बंडगार्डन समोरचा पूल, भंडारदरा धरण त्यांच्या कंपनीने बांधलेले आहे. गणेश उत्सव फुले यांनी सुरू केला होता, पुढे लोकमान्यांनी तो मोठा केला, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. फुले यांनी केवळ शिक्षणाचे कार्य केले असे नाही. ते पुण्याच्या नगरपंचायतीचे कमिशनर ( नगरसेवक) होते. रस्ता रुंदीकरण, रस्त्यावर दिवे, बंद नळातून घरपोच पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना रास्त हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, यासारखी अनेक कामे त्यांनी त्या काळात केली. 'खरा महात्मा ' असा त्यांचा उल्लेख स्वतः महात्मा गांधीजींनी केला, यातच सारे आले. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक समेळ " मी अश्वत्थामा चिरंजीव" या विषयावर व्याख्यान झाले. अश्वत्थामा चिरंजीव आहे. आजही तो आहे. कधी त्याच्या जखमेवर घालण्यासाठी तेल मागायला दारात आला तर नाही म्हणू नका.  द्रोणाचार्यांचा हा पुत्र सगळ्यात उंच आणि सर्व विद्या पारंगत होता. त्याच्या माथ्यावर रत्नमणी होता. परंतु शापाचा बळी ठरला आणि त्याच्या वाट्याला आयुष्यभराचे महाभारत जोडले गेले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी गेला. धुळे, नंदुरबार, नर्मदा, हिमालय असा प्रवास करावा लागला. खूप परिश्रमपूर्वक हा ग्रंथ साकार केला आहे. समेळ यांनी व्याख्यानमालेत आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभिनयाच्या अभिनिवेशात सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शेवटच्या दिवशी अॅड. संतोष भामरे,  संविधान आणि आरक्षण या विषयावर आपले मत व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेमुळे चांगल्या वक्त्यांची उत्तम विचार ऐकायला मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई