शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 1:09 AM

Maharashtra Election 2019: बदल की पुनरावृत्ती याकडे लक्ष; वाहतूककोंडी, पाणीप्रश्न समस्या

- मुरलीधर भवार कल्याण : ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याची सांगता होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. या मतदारसंघातील २७ गावे, वाहतूककोंडी, आरोग्याच्या समस्या आणि पाणीप्रश्न या मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसेच्या लढाईत कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे, नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे, दिवा यांचा समावेश आहे. मतदारसंघातून केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे व मनसेतर्फे राजू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. निवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच मनसेचे उमेदवार पाटील यांनी भव्य असे निवडणुकीचे कार्यालय सुरू केले आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे यांनी त्याच धर्तीवर सागाव येथे प्रचाराचे कार्यालय सुरू केले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी पाच वर्षांत मतदारसंघात कामे केली.

मात्र, शिवसेनेच्या म्हात्रे गटाकडून भोईर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी बदलून ती म्हात्रे यांना दिली. शिवसेनेतील बंडाळी पक्षाने शमवल्याने बंडखोरी टळली. तसेच भोईर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत म्हात्रे यांचे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा आदेश व शिस्त पाळा, असे बजावून शिवसेनेचे उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन केले. प्रचारात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हात्रे यांनी भेटीगाठींवर विशेष भर दिला. तसेच त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यांच्यासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकही प्रचारसभा झाली नाही.

महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा परवाच एक मेळावा पार पडला. तसेच कच्छी गुजराथी समाजाने घेतलेल्या मेळाव्यात भाजपचे राज्यसभा सदस्य आले. याशिवाय, शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांनी प्रचार केला. प्रचाराची सगळी सूत्रे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहिली. म्हात्रे हे २५ वर्षे नगरसेवक आहेत. चार वेळा स्थायी समिती सभापती होते. त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून पराभव झाला होता. तेव्हाच्या चुका त्यांनी आता सुधारल्या आहेत.

दुसरीकडे मनसेचे उमेदवार पाटील यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर जास्त जोर दिला. पाटील हे २००९ मध्ये जि.प.वर बिनविरोध निवडून आले होते.२०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजनही त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीएनसी ग्राउंडवर प्रचारसभा घेतली. त्यात रस्ते, वाहतूककोंडी या मुद्द्यांवर प्रहार केला.

तसेच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या प्रमुख सोयीसुविधा देऊ शकत नाहीत. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांवर मनसे निवडणूक लढवत आहे. तर, म्हात्रे हे मतदारसंघात भोईर यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याच्या जोरावर निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या पाठीशी सत्तेतील शिवसेना-भाजप हे पक्ष आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रथम निवडणूक पार पडली. त्यावेळी पाटील यांचे बंधू रमेश पाटील हे मनसेतर्फे निवडून आले होते. पाच वर्षे हा मतदारसंघ मनसेच्या ताब्यात होता. त्यानंतर, २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले. या मतदारसंघात मतदारांनी बदल घडवला आहे. बदलाची पुनरावृत्ती होणार की, शिवसेना विजयाची परंपरा कायम राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२७ गावांचा विकास, नगरपालिकेचे आश्वासन

म्हात्रे यांच्या जाहीरनाम्यात २७ गावे विकसित करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तर, पाटील यांच्या जाहीरनाम्यात २७ गावांची वेगळी नगरपालिका हा मुद्दा आहे. तसेच दोघांनीही दिवा डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सामायिक आश्वासन दिले आहे. मतदार कोणाला झुकते माप देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीण