शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

By admin | Updated: February 8, 2016 02:30 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत.

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत. डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशी तब्बल ४०० पदांची भरती झाली तरच या रुग्णालयांतील आरोग्य सेवेत श्रेणीवाढ होईल. अन्यथा, या महापालिका क्षेत्रातील नागरिकांना निवासी इमारतीमधील नर्सिंग होम अथवा महागडी इस्पितळे यामध्येच उपचार घ्यावे लागतील, अशी गंभीर परिस्थिती आहे.केवळ, डॉक्टरांची पदे भरून चालणार नाही. त्यांना हवा असलेला ५० जणांचा पॅरामेडिकल स्टाफ भरणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. त्याला प्रशासनाकडून मान्यता मिळाली तरच डॉक्टरांच्या भरतीला पूरक अशी व्यवस्था उभी राहून आरोग्य सेवेला लाभ होईल. महापालिकेची १३ नागरी आरोग्य केंद्रे असून प्रत्येकी १२० खाटांची क्षमता असलेली डोंबिवलीत शास्त्रीनगर व कल्याणमध्ये रुक्मिणीबाई ही रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी संख्येबरोबरच खाटांची संख्या वाढवून प्रत्येकी २०० करण्याचे प्रस्तावित आहे. ही रुग्णालये सुयोग्य आरोग्य सेवा देण्यात कमी पडतात, अशी ओरड वारंवार केली जाते. या रुग्णालयांत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रसंगी रुग्णांना कळवा येथील शिवाजी सरकारी रुग्णालय, मुंबईतील केईएम, शीव रुग्णालयात पाठविले जाते. उल्हासनगरातील मध्यवर्ती सरकारी रुग्णालयातही धाडले जाते. महापालिकेने २००७ साली रुग्णालयांसाठी आवश्यक असलेल्या ९० डॉक्टरांच्या भरतीचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास जून २०१५ उजाडले. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, या अटीचा भंग होत असल्यास पदास मंजुरी दिली जात नाही. महापालिकेस चार फिजिशियनची गरज असताना प्राप्त अर्जांमध्ये फिजिशियनसाठी एकच अर्ज आला आहे. रेडिओलॉजिस्टसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या पदांचे काय करायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. डॉक्टरांच्या नव्या भरतीमुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त ३८ लाख रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.