शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:04 AM

नव्याने आराखडा मागवला, एमएसआरडीसीसमोर नवा पेच, खर्च ३० टक्क्यांनी वाढणार

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याणचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे; परंतु तो पाडल्यानंतरही नव्या पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचे तांत्रिक अडथळे पार करताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत. आधी ६० आणि नंतर ७२ मीटरचा पूल बांधण्याचा आराखडा एमएसआरडीसीने मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवला तरच नवा पत्री पूल मंजुरीसाठी विचाराधीन राहील, असे रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास ३0 टक्क्यांनी वाढणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले.आधीच्या नियोजनानुसार पूल बांधण्यासाठी १४ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. रेल्वे प्रशासनाने ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवण्याची सूचना केल्याने, त्यामध्ये सुमारे ५ कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत २० कोटींपर्यंत जाऊ शकते अशी माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी मध्यरेल्वेच्या सूचनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आगामी आठवडाभरात नव्या नियोजनाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली. ८४ मीटरचा पूल बांधताना एमएसआरडीसीसमोर काही अडचणी आहेत. केवळ पूल बांधणे हेच उद्दिष्ट नसते; सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.पुलाच्या जवळपास १५० ते २५० मीटर परिसरात इमारती नसणे आवश्यक असते. हा निकष तपासून काम करावे लागते. आपात्कालीन स्थितीत क्रेन किंवा अन्य यंत्रणांना पुरेसी जागा मिळावी, ही सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागत असल्याचेही बोरडे यांनी सांगितले.७२ मीटरवरून ८४ मीटरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव आल्याने खर्चात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार आठवडाभरात सुधारीत आराखडा पाठवण्यात येईल. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर सर्व निकषांची तपासणी झाल्यावर रेल्वेची मंजुरी मिळेल. रेल्वेची मंजुरी प्राप्त झाल्यावरच अंतिम आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असेही बोरडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kalyanकल्याण