शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

कल्याण-डोंबिवलीतील कामांना ‘ब्रेक’;  कार्यादेश न दिल्याने कामे सरकारकडून स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 1:52 AM

राज्य सरकारच्या निधीतून महापालिका हद्दीत काही विकासकामे केली जाणार होती.

कल्याण : राज्य सरकारच्या निधीतून केडीएमसी हद्दीत करण्यात येणारी विकासकामे थांबविण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार ही कामे थांबवल्याचे महापालिकेने सरकारला कळविले आहे. दरम्यान, या आदेशामुळे आठ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.

राज्य सरकारच्या निधीतून महापालिका हद्दीत काही विकासकामे केली जाणार होती. या कामांसाठी तरतूद असली तरी त्यांना अद्याप कार्यादेश दिला गेलेला नव्हता. त्यामुळे ही कामे स्थगित करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही केली असून, या कामांची यादी सरकारकडे पाठवली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड व कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून ही कामे केली जाणार होती. या कामांना ब्रेक लागल्याने तेथील विकासकामे स्थगित करण्यात आली आहे. या विकासकामांमध्ये गटारे व पायवाटा या स्वरूपाची कामे होती. निधी मंजूर झाल्यावर ही कामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. त्याच वेळी या कामांना ब्रेक लागला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या निधीतून विकासकामे करता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून आयुक्त गोविंद बोडके यांनी गटारे व पायवाटांची कामे रोखून धरली आहेत. त्यामुळे ही कामे केली जात नसल्याची ओरड नगरसेवकांकडून केली जात आहे.

एखाद्या नगरसेवकाने गटारे आणि पायवाटांचे काम प्रभागात सुचविल्यास त्याचा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी आयुक्त स्वत: अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी करून तेथे खरोखरच या कामाची निकड किती आहे, याची शहानिशा केल्याशिवाय प्रस्ताव मंजूर करीत नाहीत. त्यामुळे नगरसेवक रडकुंडीला आले होेते. अशा परिस्थितीत आमदार निधीतून केल्या जाणाºया कामांनाही राज्य सरकारकडून ब्रेक लागणार असेल, तर राज्य सरकारने विकासकामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांकडून केली जात आहे.

रस्त्यांसाठी ३२७ कोटी रुपये कधी मिळणार?

च्आॅगस्ट व सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण भागातील २७ गावांतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. केवळ त्यावरील खड्डे बुजवून चालणार नाही, तर नव्याने डांबरी रस्ते करावे लागणार आहेत.च् राज्य सरकारकडे त्यासाठी ३२७ कोटी रुपयांची मागणी आयुक्तांनी आॅक्टोबरमध्ये केली आहे. मात्र, त्याला अद्याप सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही

च्अतिवृष्टीनंतर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर सरकार स्थापनेसाठी लागलेला एक महिन्याचा कालावधी हे पाहता नव्या सरकारकडून निधी मंजूर केला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे