शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कल्याण एपीएमसी निवडणूक: मनसे, राष्ट्रवादीसाठी भाजपाची रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:36 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवार, १७ मार्चला मतदान होत असून त्यासाठी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये युती नाही. त्यामुळे भाजपानेमनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेला एकटे पाडण्याचा भाजपाचा हा डाव बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलाच रंगला आहे. मात्र, राजकीय नेत्यांनी मतदारयादीतील घोळ दूर करण्यावर भर दिलेला नाही. दुसरीकडे याविषयी प्रशासकीय यंत्रणेने हात वर केले आहेत. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.सरकारच्या नव्या नियमानुसार १८ जागांसाठी बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, दोन जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने १६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याकरिता ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, २१ हजार ६७ मतदार आहेत. परंतु, दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने रविवारी निवडणुकीत १८ हजार ५३० मतदार मतदान करणार आहे. १५ जागा या शेतकरी मतदारांसाठी आहेत. एक जागा हमाल-तोलाई व एक जागा व्यापारी-अडते यांच्यासाठी आहे. यापूर्वी शेतकऱ्याला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क नव्हता. परंतु, आता शेतकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदारयादीत घोळ असल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांसह मतदारांनी नोंदवल्या आहेत. मात्र, त्याची दखल सरकारी यंत्रणेने घेतलेली नाही. यादीतील ७०० मतदारांच्या नावात घोळ आहे. अनेकांची नावे व वय चुकीचे आहे. मात्र, आता त्यात काहीच बदल करता येणार नाही, असे सांगून सरकारी यंत्रणेकडून हात वर केले जात आहेत. मतदानावेळी यंत्रणेने हरकत घेतल्यास मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच चुकीच्या नावांचा फटकाही उमेदवारांना बसू शकतो. ७०० मते सगळ्याच उमेदवारांसाठी निर्णायक ठरू शकतात.किसन कथोरे, नरेंद्र पवारांकडून प्रचारबाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती नाही. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादी व मनसेच्या उमेदवारांचा प्रचार केला. समितीवर भाजपाच्या जास्तीतजास्त जागा आणण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे व नरेंद्र पवार यांनी प्रचारावर अधिक भर दिला आहे.ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. ती पॅनल पद्धतीने होत असून प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार नेमक्या कोणत्या पक्षाचा आहे, हे स्षष्ट होत नाही. मात्र, पॅनल पद्धतीत कोण कोणाचा प्रचार करतो, यावरून त्या उमेदवाराच्या विजयासाठी कोण मेहनत घेत आहे, हे उघड होते.बाजार समितीवर यापूर्वी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. ते मोडीत काढत कथोरे यांनी भाजपाचा झेंडा फडकावला होता. तोच झेंडा पुन्हा फडकावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने राष्ट्रवादीशी छुपी युती केल्याने उमेदवार निवडून आल्यावर कोणत्या पक्षाचा सदस्य सभापतीपदी विराजमान होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

टॅग्स :kalyanकल्याणAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेBJPभाजपा