शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करा; अन्यथा बेमुदत आंदोलन छेडू- शंकर विरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 9:29 PM

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिकाऱ्यांनी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिकाऱ्यांनी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.पालिकेतील विविध विभागांत अनेक अधिकारी एकाच पदावर १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे जवळच्याच कंत्राटदारांशी साटेलोटे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप विरकर यांनी केला आहे. यात पालिकेचे नुकसान होऊन शहराचा विकास निकृष्ट दर्जाचा होऊ लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकाच कामाच्या वेगवेगळ्या प्रकारे निविदा काढून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा कारभार त्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असतानाही मर्जीतील कंत्राटदारांना अधिक दराने कंत्राट देण्याचे कटकारस्थान केले जात असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर काही महिन्यांतच संक्रांत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यातील बहुतांशी अधिका-यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होऊन मंत्रालयात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पारदर्शक कारभारामुळे त्या तक्रारींवर अद्याप कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने ते अधिकारी मोकाट सुटू लागल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभारात सतत वाढ होत असून त्यांच्या कारभाराचे वाभाडे गतवर्षी विधानमंडळ अधिवेशनात हक्कभंगाच्या माध्यमातून काढण्यात आले आहेत.तरी देखील आयुक्त डॉ. नरेश गीते अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आपला पारदर्शक कारभार चालवित असल्याचा संशय विरकर यांनी व्यक्त केला आहे. एकाच मलईदार पदावर वर्षानुवर्षे राहिल्याने इतर लायक अधिकाऱ्यांना हेतूपुरस्सर पदोन्नतीपासुन रोखले जाते. यामुळे शहराचा विकास चांगला न होता भ्रष्ट मार्गातुन विकासाचे तीनतेरा वाजविले जाते. याचे सोयरसुतक सत्ताधाऱ्यांना नसल्याने अशा अधिकाऱ्यांना ते सबळ पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यातच काही अधिकारी झालेल्या बदल्या सत्ताधाय््राांमार्फत रद्द करुन पुन्हा पुर्वीच्या पदावर रुजू होतात. अशा प्रकारांना विभागप्रमुखांचे पाठबळ लाभत असल्याने पुन्हा-पुन्हा तेच अधिकारी त्यांच्या दावणीला बांधले जातात. यामुळे विभागप्रमुखांचा भ्रष्ट कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निर्विवाद चालविला जातो. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागांत कराव्यात. अन्यथा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरकर यांनी आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक