शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:02 IST

जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचे कौतुक करायलाही आम्ही मागे हटणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

ठाणे : विरार येथील महानगरपालिका मुख्यालयात घातलेल्या राड्याप्रकरणी विरार पोलिसांकडून अविनाश जाधव यांना तडिपारीची नोटीस बजावण्यात आली होती. यावर जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. 

माझ्यावर ज्या अधिकाऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. जे जे अधिकारी चुकतील त्यांच्याविरोधात असेच गुन्हे दाखल करणार. परंतु जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचे कौतुक करायलाही आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दांत सुनावले आहे. जिथे मनपा अधिकारी चुकतील तिथे मनसे आंदोलनाआधी गुन्हा दाखल करेल, असा इशाराच ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. 

कोविडदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बसविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अविनाश जाधव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ठाणे पालिका मुख्यल्यासामोर पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे सेशन न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र कापूरबावडी पोलिसांनी अतिवृष्टीचे करण पुढे करत तसेच पोलीस रिपोर्ट न्यायालयात सादर न केल्याने न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली होती. 

 यानंतर ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर पोलिसांच्या वतीने जाधव यांची चौकाशीसाठी आणखीन वेळ पाहिजे होता असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळली. त्यानंतर सरकारी वकील आणि अविनाश जाधव यांचे वकील ओंकार राजूरकर यांचा युक्तीवाद झाला. अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या गुन्हयांवर युक्तीवाद करण्यात आला. जाधव यांना जामीन दिल्यास पुन्हा आशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केलेला. तर अविनाश जाधव यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतर कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचे राजूरकर यांनी न्यायालयात मांडले. अखेर न्यायालयाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेVasai Virarवसई विरारthaneठाणे