शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात ‘मानवी साखळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण ...

कल्याण : नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भरपावसात भूमिपुत्रांनी कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मानवी साखळी आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता हे आंदोलन शांततेने करीत आहोत. परंतु, या पुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमिपुत्रांनी या वेळी सरकारला दिला.

कल्याण पूर्वेतील तीसगावनाका, चक्कीनाका, नेवाळीनाका, आडिवली ढोकळी, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळफाटा येथे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला, ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोक तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आ. राजू पाटील हेदेखील मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भरपावसात भूमिपुत्र रस्त्यावर उतरला आहे. २४ जूनला याच मागणीसाठी सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आता समाजाचा संयम सुटण्याआधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा.’

आ. गायकवाड म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी योग्य आहे. मात्र, हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमिपुत्रांचे नेते असलेल्या दि.बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे.’ तर, आ. पाटील म्हणाले, ‘विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसंदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र, सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असली, तरी समाज यापुढील आंदोलनात शांतता व संयम ठेवणार नाही.’

आडिवली ढोकळी येथे झालेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, ‘दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने याप्रकरणी राजकारण करू नये.’

------------------------