शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 29, 2015 23:32 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे

नारायण जाधव, ठाणेकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची मैत्री तोडून मैदानात उतरलेल्या भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आतापर्यंत त्यांनी शहरात एक-दोन नव्हे तब्बल पाच सभा घेतल्या आहेत. एखाद्या महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: एकहाती प्रचार करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. मात्र, कपिल पाटील, किसन कथोरे, गणपत गायकवाड यासारख्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांची भिस्त असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक नेते कमालीचे नाराज झाले आहेत. यामुळे लोकसभा-विधानसभेप्रमाणे महापालिकेतही शत-प्रतिशत भाजपासाठी मुख्यमंत्र्यांना संघ स्वयंसेवकांची मनधरणी करावी लागली आहे. कधी डोंबिवली जिमखाना तर कधी एखाद्या व्यायामशाळेत स्वत: जाऊन संघ ‘दक्ष’ राहण्याची मनधरणी केली.महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांनी एकहाती पेलली. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शहरात कधी आले, कोठे सभा घेतल्या, काय प्रचार केला आणि कोणाचे ‘कल्याण’ करून गेले, हे खऱ्या अर्थाने २ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच कळणार आहे.पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. नंतर, अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे शाही भोजन घेतले. या दोन्ही घटना सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या. तर, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणुकीशी संबंध नसताना आयुक्त ई. रवींद्रन यांचा फोटो फेसबुकवर वापरून पक्षासह साऱ्यांनाच अडचणीत आणले. त्या २७ गावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची स्थानिक नेत्यांनी तशी अडचणच केली आहे. कारण, कोकण आयुक्तांनी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालानुसार त्या गावांची स्वतंत्र महापालिका शक्य नाही, हे लक्षात आणल्यानंतर त्यांना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट केले. नंतर मात्र ती वगळल्यास काही बिल्डरांच्या ‘लोंढ्यां’मुळे महापालिकेत स्वबळावर भाजपाची ‘मंगलप्रभात’ कशी होईल, असे उपऱ्यांसह काही स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा गळी उतरवले. त्यामुळे कोणताही विचार न करता त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती गावे पुन्हा वगळली. मात्र, निवडणूक आयोगाने ते न जुमानल्याने त्यांना या प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरवावे लागले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई, वसई-विरार, अंबरनाथ- बदलापूर येथे भाजपाने सपाटून मार खाल्ला. कारण स्वपक्षातील असंतुष्टांनीच या ठिकाणी सुरुंग लावला होता.