शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ठाणे जिल्ह्यात इतिहास घडला, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 21:25 IST

शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे.

ठाणे – शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा सर्वच ठिकाणी शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्याईमुळे आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या अहोरात्र मेहनतीमुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिवसेनेची जिथे जिथे सत्ता आहे, तिथल्या विकास कामांवर उद्धवसाहेब आणि युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे बारीक लक्ष असते. ग्रामीण मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला जागत शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचाही विकास करण्याचे वचन शिवसेना निश्चितपणे पूर्ण करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. शिंदे यांनी रचलेल्या जबरदस्त व्यूहरचनेमुळे विरोधकांची पुरती कोंडी झाली. श्री. शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि विकासाच्या नावाने भूलथापा देणाऱ्या विरोधकांना जनतेसमोर उघडे पाडले. त्यामुळेच शिवसेना जे बोलते, ते करून दाखवते यावर विश्वास ठेवत ठाणे जिल्ह्यातील जनतेने शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावला.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही असलेले एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात विकासकामांचा धडाका लावला होता. शहापूर तालुक्यासाठी भावली धरणाची योजना त्यांनी मंजूर करून आणली. अनेक गाव-खेड्यांमध्ये बारमाही टिकणारे रस्ते केले. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावागावात शाश्वत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना भाताबरोबरच रब्बी हंगामात भाजीपाला पिकवण्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात शिवसेनेने केलेली ही कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवल्यानेच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकल्याचे सांगतानाच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ठाणे जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना