शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

ठाणे जिल्ह्यात इतिहास घडला, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 21:25 IST

शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे.

ठाणे – शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा सर्वच ठिकाणी शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्याईमुळे आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या अहोरात्र मेहनतीमुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिवसेनेची जिथे जिथे सत्ता आहे, तिथल्या विकास कामांवर उद्धवसाहेब आणि युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे बारीक लक्ष असते. ग्रामीण मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला जागत शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचाही विकास करण्याचे वचन शिवसेना निश्चितपणे पूर्ण करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. शिंदे यांनी रचलेल्या जबरदस्त व्यूहरचनेमुळे विरोधकांची पुरती कोंडी झाली. श्री. शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि विकासाच्या नावाने भूलथापा देणाऱ्या विरोधकांना जनतेसमोर उघडे पाडले. त्यामुळेच शिवसेना जे बोलते, ते करून दाखवते यावर विश्वास ठेवत ठाणे जिल्ह्यातील जनतेने शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावला.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही असलेले एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात विकासकामांचा धडाका लावला होता. शहापूर तालुक्यासाठी भावली धरणाची योजना त्यांनी मंजूर करून आणली. अनेक गाव-खेड्यांमध्ये बारमाही टिकणारे रस्ते केले. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावागावात शाश्वत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना भाताबरोबरच रब्बी हंगामात भाजीपाला पिकवण्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात शिवसेनेने केलेली ही कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवल्यानेच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकल्याचे सांगतानाच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ठाणे जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना