शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

जोरदार पावसाचा पक्ष्यांना फटका, काही पक्षी परतीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:28 AM

जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले.

- पंकज रोडेकर ठाणे : जोरदार पावसाचा फटका ठाण्यातील ४५ दुर्मीळ पशुपक्ष्यांना बसला असून गेल्या काही दिवसांमध्ये पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन गारठलेल्या अवस्थेत दुर्मीळ पशुपक्ष्यांना ठाणे एसपीसीए संस्थेत तातडीने उपचार करण्यात आले. यामध्ये १७ घारी तर ९ घुबड यांच्यासह दोन गरुड, एक किंगफिशरसारख्या पक्ष्यासह पहिल्यांदाच पावसाळ्यात दाखल झालेल्या सहा कासवांचा समावेश आहे.ठाणे, घोडबंदर, डोंबिवली, विरार, मुलुंड आणि भांडुप या परिसरातील हे पक्षी असून २२ पक्ष्यांना येऊरच्या जंगलासह वेगवेगळ्या परिसरात सोडण्यात आले. यंदा मान्सूनपूर्व पावसापासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. त्यामध्ये जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली.त्यातच जोरदार वाºयामुळे आणि पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने पक्ष्यांचे निवारे नष्ट झाले आहेत. त्यातच, निवारा नसल्याने पावसात भिजण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.पावसात भिजल्यावर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे काही पक्ष्यांना न्यूमोनियासारखा आजार होतो. पावसाने गारठलेल्या अवस्थेतील पशूंना पाहून प्राणिमित्र त्यांचे प्राण वाचवण्यासाठी ठाणे, ब्रह्मांड येथील पशुप्राण्यांवर उपचार करणाºया संस्थेत धाव घेत, त्यांना उपचारार्थ दाखल करतात.अशा प्रकारे १ जून ते १५ जुलैदरम्यान साधारणत: ४५ दुर्मीळ पशुपक्षी उपचारार्थ दाखल झाले असून त्यातील २२ पक्ष्यांना उपचारानंतर मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहेत. या दिवसांत जखमी होऊन दाखल झालेल्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने घुबड आणि घारींचा समावेश सर्वाधिक आहे. १७ घारी आणि ९ घुबडांसह सहा कासव, पाच पानबगळे आणि प्रत्येकी दोन कोकिळा, गरुड, मैना यांचा समावेश आहे.उर्वरित २३ पशुपक्ष्यांवर मागील काही दिवसांंपासून उपचार सुरू असून येत्या ८ ते १० दिवसांत त्यांना येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरातून आणले, त्यात्या परिसरात मुक्तसंचारासाठी सोडले जाणार आहे. मागील वर्षी याच दिवसांत ३० पक्षी दाखल झाले होते. यावर्षी ही संख्या वाढल्याचे उपचार करणाºया संस्थेतील डॉक्टरांनी सांगितले. या पक्ष्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.>पक्ष्यांच्या संख्येत वाढया पक्ष्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना शक्तिवर्धक टॉनिक, व्हिटॅमिनचे ड्रॉप पाजण्यात येत आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या रुग्णालयात वेळप्रसंगी जखमी झालेल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पशुपक्षी वैद्य डॉ. सुहास राणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा मात्र, अशा पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली.