शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

उल्हासनगरला देवही वाचवू शकत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:31 AM

नगरसेवकांच्या असहकार्यामुळे उल्हासनगर पालिका डबघाईला आली. अशीच परिस्थिती राहिल्यास या शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंगळवारच्या महासभा तहकुबीनंतर व्यक्त केली

उल्हासनगर : नगरसेवकांच्या असहकार्यामुळे उल्हासनगर पालिका डबघाईला आली. अशीच परिस्थिती राहिल्यास या शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंगळवारच्या महासभा तहकुबीनंतर व्यक्त केली. यापुढे उल्हासनगरात आयुक्त म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पालिकेच्या चांगल्या कामाला नगरसेवक सहकार्य करीत नाही. त्याचा विकासकामांवर परिणाम झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता अभियानासह विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींचे हितसंबध दुखावल्याने त्यांनी विरोध सुरू केला. नगरसेवकांच्या असहकार्यामुळे आयुक्तपदी राहण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे. कोणतेही काम हाती घेताना तिजोरीचा ‘सल्ला’ आधी घ्यावा लागतो. नगरसेवक करवाढीला विरोध करतात. मग खर्च भागविण्यासाठी पैसे येतील कुठून? असा प्रश्नही आयुक्तांनी केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेला मुलभूत सेवाही पुरवता येणार नाहीत. अशा पालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याची आता इच्छाच राहिली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. अधिकाºयांची ७० टक्के, तर ३० ते ३५ टक्के इतर पदे रिक्त आहेत. पाठपुरावा करूनही अधिकारी दिले जात नाही. कनिष्ठ कर्मचाºयांवर प्रभारी पदभार देऊन कामे करून घेतली जात आहेत. त्यांचा परिणाम पालिकेच्या कामावर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.सत्ताधाºयांतीलवादाचा फटकाउल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी पक्षातील भाजपा, त्यातील दोन गट, ओमी टीम आणि साई पक्षातील वाद चव्हाट्यावर येत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. या पक्षांत परस्परांत ताळमेळ नसल्याने महापालिका प्रशासनावरील त्यांची पकड निसटली आहे. नगरसेवकांची लहानसहानही कामे होत नसल्याने बहुतांश नगरसेवक नाराज झाले असून त्यांनी आयुक्तांना टार्गेट केले आहे.गेल्या महासभेत सत्ताधाºयांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त हुकूमशहा झाल्याचा आरोप करून त्यांना अधिकाराचे विक्रेंद्रीकरण करण्याचा सल्ला दिला. आयुक्त आणि अधिकाºयांच्या गैरहजरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत महासभा स्थगित केली.स्वच्छता अभियानांतर्गत उपभोक्ता कर लावण्याचा प्रस्तावासाठी मंगळवारी विशेष महासभा झाली. मात्र नगरसेवकांनी मुख्य प्रश्नाला हात न घालता पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत आयुक्तांसह पालिका अधिकाºयांची कोंडी केली. पाणीप्रश्न सुटेपर्यंत महासभा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर आयुक्तांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे आयुक्त प्रचंड नाराज झाले.