शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:32 AM

भाजीपाल्याची आवक घटली; डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात नाशिक आणि गुजरात राज्यातून भाजीपाला पुरवठा होत असतो, परंतु अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच डाळींच्या दरांमध्येही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.पालघर जिल्ह्यात नाशिकसह गुजरात राज्यातल्या वापी आणि सुरत भागातून सुमारे ५० ते ६० ट्रक भाजीपाला वितरित केला जातो. तर जिल्ह्यातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रफळावर वेलवर्गीय भाजीपाला ज्यात दुधी, गलके, कारले आदी भाजीसह मिरची, सिमला मिरची, वांगी, टॉमेटो आदीचे उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळीमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. कांद्याचाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलो असा भाव झाला असून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बंद झाले असून नोकऱ्यांवर पाणी फिरले आहे. अनेक उद्योगधंदेही बंद पडल्याने हातमजुरी करणाºया गोरगरीबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे.सध्या लोकल सेवा बंद असल्याने माझ्या पतीला कामावर जात येत नसल्यामुळे एप्रिलपासून अर्धाच पगार मिळत आहे. त्यामुळे आमच्या घरचे बजेट गडबडले असून येत्या सणासुदीच्या दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता वाटते.- शालिनी मेहेर, ग्राहकपालघर जिल्ह्यात भाजीपाल्याची नाशिक आणि गुजरातमधून होणारी आवक सध्या घटली असल्याने दर वाढले आहेत. मात्र नोकºया तसेच कामधंदे बंद झाल्याने ग्राहकांकडून कमी भाजीपाला खरेदी केला जात आहे.-देव लुक्षा, भाजीविक्रेता पालघरअनेक कष्ट घेऊन शेतकरी शेतमाल पिकवतो, मात्र विक्री व्यवस्थेतील असंख्य अडचणींमुळे तो त्याची विक्री करू शकत नाही. त्यामुळे भाववाढीनंतरही उत्पादकांना कोणताच आर्थिक फायदा होत नाही.- शेतीनिष्ठ देवेंद्र राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरीभाजीपाला-डाळी महागण्याची कारणेपालघरला भाजीपुरवठा करणाºया नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या