शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानाचा डोक्याला ‘ताप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

कल्याण : कोरोनाचे सावट कायम असताना दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही लक्षणे कोरोनासारखी असल्याने संबंधित रुग्णांनी याकडे दुर्लक्ष न करता खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल, असा मोलाचा सल्ला केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागासह तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की, पावसाळ्यातील साथींचे आजार डोके वर काढतात. त्यात तापाचे रुग्ण अधिक असतात. तापावरून अन्य आजारांची तपासणी केली जाते. त्यातून डेंग्यू, मलेरिया, टाॅयफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या आदी आजारांची लागण मनपा हद्दीतील दाट वस्त्यांसह अन्य ठिकाणच्या लोकवस्तीतून होते. अशावेळी शहरांतील मनपा व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णांची झुंबड उडत असल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, पण संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. जूनच्या सुरुवातीला चांगला दमदार पाऊस पडला, मात्र गेल्या आठवड्यापासून ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलात तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यात निदानाअंती बहुतांश रुग्ण सामान्य तापाचे आहेत. एखाद्‌दुसरा कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता, केडीएमसीच्या हद्दीत बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सबाबत वेळीच सतर्कता आणि खबरदारी नाही बाळगली, तर पुढे संक्रमणाच्या माध्यमातून धोका वाढण्याची भीती डॉ. आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली. तापाबरोबर सर्दी, खोकल्याचे रुग्णही उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. समीर जोशी यांनी दिली.

-----------------------------------------------------

कोरोना चाचणी बंधनकारक

बदलत्या हवामानात तापाचे, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळतात. सध्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तपासणीअंती १० पैकी एकच रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दरम्यान, आपल्याकडे कोरोनाचे आजही १०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आलेला नाही. या साथरोगाच्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला व अन्य काही कोरोनासारखी लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील धोका टळेल. जर कोरोना नसल्याचे निदान झाल्यास त्याप्रमाणे पुढील उपचार घेऊ शकतात.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग प्रतिबंधक विभाग अधिकारी, केडीएमसी

------------------------------------------------------