शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 00:13 IST

विकास प्रकल्पांनी धरला जोर; निवडणुकांपूर्वी सरकारला भूमिपूजनाची घाई

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील मेट्रो लाइन ४, ५ आणि ९ या मार्गिकांचे भूमिपूजन आणि सिडकोच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र, सुमारे २४ किमी. लांबीच्या मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही बाजूस असलेला व १२८ गावांतून जाणारा विरार - अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर आणि जिल्ह्यात ३९.६६ किमी. धावणारी बुलेट ट्रेन आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेतकºयांच्या मनधरणीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अन्यथा विरार-अलिबाग कॉरिडोरचेही मेट्रोच्या मुहूर्तावर, म्हणजेच १८ डिसेंबरला भूमिपूजन करता आले असते.स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावरील जिल्ह्यातील महापालिकांच्या परिसरात विकासप्रकल्पांनी सध्या जोर धरला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आखत्यारीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प युद्धपातळीवर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी त्यांच्या भूमिपूजन सोहळ्यांना महत्त्व आले आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १८ डिसेंबरला हाती घेतला. तिच्या दोन्ही बाजूकडून जाणारा विरार - अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर ठाणे जिल्ह्यातून ३९.६६ किमी. जात आहे. याशिवाय या दोन्ही प्रकल्पांच्या मधून नॅचरल गॅसचा पाइपलाइनचाही प्रकल्प आहे. मात्र, भूसंपादनात अडकलेल्या या प्रकल्पांसाठी संबंधित शेतकºयांची मनधरणी प्रशासनाद्वारे सुरू आहे.ठाणे - कल्याण - भिवंडी या मेट्रो प्रकल्पाचे कल्याण एपीएमसी मार्केट हे पहिले स्टेशन आहे. त्यानंतर कल्याण मेट्रो स्टेशन, सहजानंदचौक, दुर्गाडी, आधारवाडी, गोवेगाव एमआयडीसी, रांजनोली, टेमघर, गोपाळ नगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूरफाटा, पूर्णा, कोलशेत आणि कशेळी, बाळकूमनाका आणि कापूरबावडी आदी या मेट्रोची प्रमुख १७ स्टेशन आहेत. सुमारे ८७६ कोटी ७९ लाखांच्या खर्चाच्या या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.मल्टिमोडल कॉरिडॉरवर १२,९७५ कोटींचा खर्चएमएमआरडीएच्या नियंत्रणातील हा प्रकल्प आहे, त्यावर १२ हजार ९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यावर नऊ हजार ३२६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर, दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी. मार्गाच्या बांधणीसाठी तीन हजार ६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. विरार ते अलिबाग या कॉरिडोरमुळे पालघर-ठाणे-रायगड तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होईल. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने होणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMetroमेट्रोNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा