शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

सायकलप्रेमींनी डोंबिवलीला दिली अनोखी गती , पहिल्या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 07:07 IST

सायकलने आरोग्याची गुरु किल्ली दिली आहे . याच सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे, असे प्रतिपादन बंदरे व विकास, आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील पहिल्यावहिल्या सायकल मित्र संमेलनात केले.

डोंबिवली : सायकलने आरोग्याची गुरु किल्ली दिली आहे . याच सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे, असे प्रतिपादन बंदरे व विकास, आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील पहिल्यावहिल्या सायकल मित्र संमेलनात केले.येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात हे संमेलन पार पडले. डोंबिवली सायकल क्लब, क्रीडाभारती, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन आणि वाहतूक पोलिसांनी भरवलेल्या आणि चार सत्रात पार पडलेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद््घाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.पहिल्या सत्रात झालेल्या उद्घाटनप्रसंगी क्र ीडाभारती संस्थेचे महामंत्री राज चौधरी, संमेलनाचे आयोजक कमलाकर क्षीरसागर, पद्यनाभ गोखले, ऋ षीकेश यादव, डॉ. सुनील पुणतांबेकर उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी उपक्रमात कल्याणला सध्या विशेष महत्त्व दिले गेले आहे. परंतु पुणे शहरात ज्याप्रमाणे सायकल आराखडा बनविला गेला, त्याधर्तीवर डोंबिवलीतही सायकलस्वारांसाठी विशेष आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.डोंबिवली शहराने दरवेळी नवीन उपक्र माचा पायंडा पाडला आहे. पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे, असे चव्हाण म्हणाले. अशी सायकल संमेलने जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत. सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे. सायकल ही पर्यावरणाची गरज असून तिचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, असे आवाहन क्र ीडाभारतीचे महामंत्री राज चौधरी यांनी केले. मुंबईत ज्याप्रमाणे दरवर्षी दुर्गमित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याचप्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकलमित्र संमेलन होईल, असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले.याआधी सायकल रॅली, स्पर्धा आपल्याला माहित होती. तसेच सायकलचे स्टंट टिव्ही शोच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. परंतु राज्यभरातील सायकलपटूंना एकत्र आणून समन्यवाची चळवळ तसेच यंत्रणा उभी राहावी, यासाठी हे संमेलन भरविण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीअंतर्गत सायकलस्वारांसाठी शहरात सायकल ट्रॅक असावा, तसेच स्मार्ट सिटीच्या प्रक्रि येत सायकलप्रेमी आणि सायकल क्लब यांना सामावून घ्यावे. सायकल ट्रॅकची उभारणी झाल्यानंतर अन्य वाहनांचे त्यावर अतिक्रमण होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जावी अशी अपेक्षा क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते सायकल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन लीना ओक-मॅथ्यू यांनी केले.या संमेलनानिमित्त रविवारी सकाळी सायकल रॅलीही काढण्यात आली. त्याला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यात अनेक वेगळ््या आणि अनोख्या सायकली डोंबिवलीकरांना पाहायला मिळाल्या. त्यासाठी ८० वर्षाचे ज्येष्ठ सायकालिस्ट गोविंद परांजपे सांगलीहून आले, ७६ वर्षाचे श्यामसुंदर केसरकर हे ठाण्याहून आले. शहरातील पाच ठिकाणांहून ७०० सायकलस्वार यात सहभागी झाले होते. पुणे, पनवेल, धुळे, नाशिक, बुलढाणा आदी भागातून सायकलपटूंनी यात सहभाग नोंदवला.चित्र प्रदर्शनातून आरोग्याचा कानमंत्र देण्यात आला. ‘सायकल पळवा, आरोग्य मिळवा,’ ‘सायकल चालवून आरोग्य होई सशक्त, स्वच्छ हवेसाठी करूया निसर्ग प्रदूषणमुक्त,’ ‘प्लीज युज सायकल (पीयुसी)’ असे संदेश प्रदर्शनातून देण्यात आले. प्रदर्शनाच्या ठिकाणी सिंगल, दोन-तीन सीट अशा विविध प्रकारच्या सायकली पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.‘त्या’ सायकलपटूंचा विशेष सत्कारसंमेलनाला राज्यातील विविध सायकल क्लबचे प्रतिनिधी आणी विक्र मवीर सायकलपटूंनी मोठया संख्येने हजेरी लावली.ज्येष्ठ सायकलपटू ९० वर्षीय डी. व्ही. भाटे, ८० वर्षीय गोविंद परांजपे यांच्यासह सुनिल ननावरे, संजय मयुरे आणि कृत्रिम पायांच्या साह्याने विक्रमी सायकल मोहीम पार पाडणारे सुशील शिंपी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मार्गदर्शन आणि अनुभवकथनसायकलसंबंधी विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. अनुभवांची देवाण-घेवाण, ज्यांनी काही खास घडविले आहे अशा व्यक्त ी आणि क्लब यांचे कौतुक करण्यात आले. सायकल चालविताना आरोग्य आणि सुरक्षा कशी राखावी, आदी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. अंध सायकलपटूंचा व त्यांचे प्रशिक्षक राजेश शुक्ला यांचा सत्कार करण्यात आला.केळकर, डावखरे, दामले यांची उपस्थितीसंमेलनादरम्यान ठाण्याचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि कल्याण-डोंबिवलीचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनीही उपस्थिती लावली. पहिल्या संमेलनाबाबत डोंबिवलीकरांचे कौतुक करीत पुढील संमेलन हे ठाण्यात व्हावे, अशी इच्छा केळकर आणि डावखरे यांनी व्यक्त केली. दिल्लीसारखी शहरे प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहेत. कल्याण-डोंबिवलीलाही प्रदुषणाचा त्रास आहे. त्यामुळे अशी संमेलने गरजेची आहे. यातून प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. सायकल मित्र संमेलन ही एक चळवळ असून या माध्यमातून काही उपक्रम सुचविले, तर शासनाकडे पाठपुरावा करून सहकार्य करू, असे केळकर म्हणाले; तर दामले यांनी यंदाच्या कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पात शहरात सायकल ट्रॅक उभारण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी