शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महासभेतही महाशिवआघाडी, प्रस्तावांचा विरोध मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:47 AM

एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले.

ठाणे : एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले. सोमवारी झालेल्या महासभेत कोणते विषय मंजूर करायचे, कोणते नामंजूर, तहकूब करायचे, असे सर्व सोपस्कार शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसचे आधीच ठरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे महासभेचा हा अजेंडा ठरवित असताना भाजपला कसे अडचणीत आणायचे, याची रणनीतीही निश्चित झाली होती. त्यानुसार, महासभेत भाजप विरुद्ध महाशिवआघाडी असे चित्र दिसून आले. एकेक विषय मंजूर करीत असताना महाशिवआघाडीचा विजय असो, असा जयघोषही काहीवेळ पाहावयास मिळाला.राज्यात आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस अशी सत्तेची समीकरणे जुळत आली असताना त्याचा फायदा घेऊन ठाणे महापालिकेत मात्र महाशिवआघाडीचे सूत जळून आल्याचे दिसून आले. महापालिकेत सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपसह राष्टÑवादी हे सुरुवातीपासून विरोधी बाकावर आहेत. मात्र, राज्यात युतीचे सरकार याआधी होते, त्यानुसार काही गोष्टींमध्ये भाजप ठाण्यात शिवसेनेला साथ देत होती. तर, राष्टÑवादीकडून विरोधी पक्षाची भूमिका बजावली जात होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नको ते विषय मंजूर करायचे, जरी झाले तरी त्याला राष्टÑवादी विरोध करताना दिसत होती. काही प्रकरणांवरून तर राष्टÑवादी थेट न्यायालयातही गेली आहे.परंतु, आता राज्यात महाशिवआघाडीची समीकरणे जुळून येत असताना त्याचा फायदा घेऊन शिवसेनेने राष्टÑवादी आणि काँग्रेसला आपलेसे करून सोमवारी झालेल्या महासभेत अनेक किचकट आणि नको ते विषयसुद्धा एकहाती मंजूर करून घेतले. विशेष म्हणजे महासभा कशी चालवायची, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कशी भूमिका घ्यायची, त्याला राष्टÑवादी त्याला कशा प्रकारे उत्तर देणार आणि भाजपला एकाकी कसे पाडले जाईल, यासाठीची रणनीती आदल्यादिवशीच निश्चित केली होती.त्यानुसार, महासभा सुरू होण्यापूर्वीही महाशिवआघाडी अधिक घट्ट करण्यात आली. त्यानुसार, महासभेत मंजुरीसाठी आलेल्या एक्सॉनला जागा देण्याच्या प्रस्तावाविरोधात भाजपचे सर्व नगरसेवक असताना शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसने हा विषय चुटकीसरशी मंजूर करून घेतला.>आता भाजप विरोधी बाकांवरआता आपली महाशिवआघाडी आहे, असे सांगून महाशिवआघाडीचा विजय असो, अशी घोषणाही करण्यास काही नगरसेवक मागेपुढे पाहताना दिसले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी काही प्रकरणांना विरोध करण्याचा प्रयत्न करत असताना तू पण काँग्रेसमध्ये होता, आता तुला पश्चात्ताप होईल, असा टोमणाही काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी पवार यांना लगावला. एकूणच भाजपचे २३ नगरसेवक एकीकडे आणि महाशिवआघाडीचे नगरसेवक एकीकडे असे संख्याबळ महासभेत दिसून आले. त्यामुळे भाजप या महासभेत विरोधी बाकावर गेल्याचे दिसून आले.