शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणवादी पक्के स्वार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 03:03 IST

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

 - अविनाश जाधवगणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. पर्यावरणवादी हे पक्के स्वार्थी असल्याचा मनसेचा आरोप असून ते व अशी विघ्नसंतोषी माणसे केवळ हिंदूंच्या सणांमध्ये कधी डीजेवरून, तर ढोलताशा वाजवण्यावरून, तर कधी दहीहंडीचे थर लावण्यावरून विघ्न आणतात, असा मनसेचा दावा आहे.मचे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव असो की नववर्ष स्वागतयात्रा असो, या सगळ््या गोष्टींना जेव्हा विरोध होतो, तेव्हा लोकांमध्ये चीड निर्माण होते. मग लोक तक्रारी करतात किंवा कोणाकडे तरी मदत मागायला जातात. आम्ही नववर्षाचे स्वागत करताना आमचे ढोल पथक बंद केले जाते. ते तर पारंपरिक वाद्य आहे, परंपरागत ते वाजवले जाते. दहीहंडी आली की, तो उत्सव साजरा करायचा नाही, तिथेही विरोध होतो, त्यावर बंधने आणली जातात. आमच्या हिंदूंच्या किंवा मराठी लोक जे सण मोठ्या प्रमाणात साजरे करतात, त्या सणांना कधी डीजे लावण्यावरून तर कधी थर लावण्यावरून विरोध होतो, मग त्यातून लोकांचा उद्रेक होतो. डीजे किंवा ढोलताशा पथकांवरील अन्यायाचे विषय निर्माण होतात. आम्हाला ढोलताशा वाजवायला परवानगी देताना आवाजाची मर्यादा आणली जाते. साधारण चारपाच माणसं एकत्र येऊन जेव्हा गप्पा मारतात, तेव्हा तो आवाजही ६० डेसिबलपर्यंत जातो. विरोध करणाऱ्यांनी केवळ विरोध करू नये, तर आम्हाला पर्याय द्यावा, कोणत्याच गोष्टींची परवानगी आम्हाला देणार नसाल आणि सर्वच गोष्टींवर बंदी येणार असेल, तर आमचा त्याला विरोधच राहील. दीड दिवसाचे, पाच दिवसांचे आणि १० दिवसांचे विसर्जन असे वर्षातील फक्त तीन दिवस आम्ही डीजे लावायला परवानगी मागितली आहे. वर्षाचे बाराही महिने अजान वाजवली जाते, चारचार किलोमीटरपर्यंत त्या अजानचा आवाज जातो. त्यावेळी पहाटे ५ वाजता ध्वनिप्रदूषण होत नाही का? आम्ही त्यावेळी झोपलेलो असतो. आमचे म्हणणे एकच आहे की, कायदा सगळ्यांसाठी एकच असावा. एका धर्मासाठी एक आणि दुसºया धर्मासाठी वेगळा नसावा. आता जे दिसतंय त्यात फक्त हिंदूंच्या सणांनाच लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आम्ही विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, जर मंडळ परवानगी देत असेल, तर तुम्ही बिनधास्त डीजे वाजवा. सर्व धर्मांसाठी कायद्याची समान अंमलबजावणी व्हावी. आजपर्यंत अजानबाबत कोणता निर्णय घेतला गेला? त्यावर चर्चा खूप झाली, पण सगळ्या मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले, असे कधी पाहिले का? गणपती बसलेला मंडप सर्रासपणे उखडला जातो. मग शुक्रवारी नमाज पढताना रस्ते अडवले जातात. त्यावर का बोलले जात नाही? ते रस्ते का मोकळे केले जात नाही? हे सगळे घडते तेव्हा कायदा मोडतो. हिंदू-मुस्लिम असा धर्म बघून निर्णय करणे कितपत योग्य आहे. दहा लाख गोविंदा मनसेच्या निर्णयानंतर रस्त्यावर येतात, याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेला मनसेची भूमिका पटली आहे. आम्ही सतत कायदा हातात घेतो म्हणून मनसेची राजकीय अवस्था तोळामासा झाली, हे हेत्वारोप अयोग्य आहेत. भाजपा १५ वर्षांपूर्वी दिसत होता का? आठदहा वर्षांत शिवसेना संपेल की काय, अशा परिस्थितीत होती. पण परत सत्तेत आली. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करून काँग्रेस संपली का? यापुढील ५० वर्षे भाजपाच सत्तेत येणार आहे का? त्यामुळे कोणताही पक्ष हा संपत नसतो. मनसे २०१४ च्या निवडणुकीनंतर संपली का? परंतु, येत्या निवडणुकीत लोकांचे, तरुणांचे हेच प्रश्न हाती घेतल्यामुळे मनसे महाराष्ट्रात खूप मोठी झालेली दिसेल.पर्यावरणवादी बोगस आहेत. यांच्या फायद्यासाठी यांचे पर्यावरण आहे. डॉ. महेश बेडेकर पर्यावरणाचा मुद्दा उचलतात, परंतु त्यांनीच जोशी-बेडेकर महाविद्यालय बांधताना खारफुटीची कत्तल केली आहे. खारफुटीची कत्तल करून त्यावर भरणी टाकताना पर्यावरणाचा विषय त्यांना आठवला नाही का? पर्यावरणवाद्यांसाठी पर्यावरण हा विषय केवळ त्यांच्या स्वार्थासाठी आहे. जिथे त्यांचा फायदा असतो, तिथे पर्यावरण हा विषय लागू होत नाही. सण सणांसारखे साजरे व्हावेत. मग यापुढे मौनव्रत धारण करून सण साजरे करायचे का? गणपती आल्यावरही हजारो लोक हाताची घडी, तोंडावर बोट घेऊन शांत बसले आहेत, अशा प्रकारे सण साजरे करू का? पुण्यात २५ हजार महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हटले तर त्यावेळी त्यांच्या बोलण्यामुळे ध्वनिप्रदूषण होते म्हणून उद्या तेही बंद करा, असा आग्रह हे पर्यावरणवादी धरतील. ठरावीक लोक एकाच धर्माच्या पाठी हात धुऊन लागले आहेत. दुसºया धर्मांच्या वाटेला जाताना त्यांना भीती वाटते. मनसे एकमेव पक्ष असा आहे की, जो लोकभावनेचा विचार करतो. लोकभावनांचा विचार होत नसेल, तर आम्ही कायदा हातात घेऊ. आम्ही चांगली गोष्ट केली की, तो राजकीय स्टंट वाटतो. आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा तो स्टंट वाटला, पण स्टेशन परिसरातून लोकांना चालताना आनंद वाटतो, हे ते जाहीरपणे कबूल का करत नाही. आम्ही रेल्वेभरतीवर आंदोलन केले, तेव्हा तोही स्टंट ठरवला गेला. पण आज मराठी मुले रेल्वेत कामाला घेतली जातात, महाराष्ट्रात रेल्वेच्या परीक्षा होतात. आमच्या अशा स्टंटमधून राज्यातील तरुणांंचा फायदा होत असेल, त्यांना दहीहंडी साजरी करायला मिळत असेल, तर होय आम्ही असे स्टंट करणार. जर वर्षभर अजानचा आवाज सहन करत असाल, तर वर्षातील तीन दिवस डीजेचाही आवाज सहन करा. मिरवणुकीत नाचणाºया मुलांमध्ये उत्साह व जोश असतो, त्यांच्या चेहºयावरील आनंदावर विरजण टाकू नका.(लेखक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष आहेत)

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८MNSमनसे