शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना हवी महिनाभरापेक्षा जास्त सुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 1:25 AM

परतल्यावरही १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे होणार; ठाण्यातील कोकणवासीयांना चिंता

ठाणे : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आधीच गावी १० दिवसांचे क्वारंटाइन सक्तीचे असताना, मुंबई महापालिकेने चाकरमान्यांना परतल्यावरही पुन्हा १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. त्याच धर्तीवर आता ठाणेकरांनाही परत आल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे होते की काय, अशी चिंता सतावत आहे. ठाणे महानगरपालिकेनेही तसाच निर्णय घेतल्यास चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी १0 दिवस, गावी क्वारंटाइन होण्यासाठी १० दिवस आणि परतल्यावर पुन्हा क्वारंटाइन होण्यासाठी १४ दिवस अशा तब्बल ३४ दिवसांच्या सुटीचे नियोजन करावे लागणार आहे.चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवाकरिता जाण्यासाठी एसटी बसेसची सोय केल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी आरक्षण करून कोकणात पोहोचत आहे. गणेशोत्सव करून हा चाकरमानी पुन्हा मुंबईतही परतेल. परंतु, परराज्य किंवा परजिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्यांना क्वारंटाइन सक्तीचे केले, तरच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कोकणात जाणाºया ठाणेकरांनाही क्वारंटाइनची सक्ती करणाºया ठाणे महानगरपालिकेने गणेशोत्सव आटोपून आल्यावर आणखी १४ दिवस घरीच बसवले तर काय होणार, या विचाराने ठाणेकर चिंताग्रस्त झाले आहेत. अनलॉकमध्ये काही उद्योग, कार्यालये सुरू झाली आहेत. आधीच नोकºयांची शाश्वती नसताना गणेशोत्सवाहून परतल्यावर पुन्हा १४ दिवसांची सुटी मिळणे शक्य नाही. गणेशोत्सवापेक्षा क्वारंटाइनचेच दिवस जास्त होत असल्याने चाकरमानी टेन्शनमध्ये आहेत.कोकणात जाणाºयांसाठी सरकारने १0 दिवसांचे होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींनी क्वारंटाइनसाठी १४ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे गावी १४ दिवस क्वारंटाइन, गणेशोत्सवाचे पाच किंवा १0 दिवस आणि पुन्हा इथे येऊन १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे म्हणजे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी लागणार आहे.- दीपेंद्र नाईक, ठाणेकोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी क्वारंटाइनची सक्ती करणे समजण्यासारखे आहे. पण, मग सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे. मुंबई सोडून पळालेले अनेक जण पुन्हा कामाच्या शोधात मुंबईत परतू लागले आहेत. ते सक्तीने क्वारंटाइन होतात की नाही, हे पाहण्याची तसदी कुणीही घेत नाही. मग, गणेशोत्सवासाठी जाणाºयांनाही सक्ती नसावी.- रोहिणी चेंदवणकर, ठाणेक्वारंटाइनचा नियम सर्वांच्याच भल्यासाठी आहे. बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइन झालेच पाहिजे, असे निर्देश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार, ठाणेकरांनीही गणेशोत्सवाहून परतल्यावर स्वत:हूनच १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे. त्यासाठी आणखी वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही.- संदीप माळवी, उपायुक्त,ठाणे महानगरपालिका