शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात ठाणे भाजपाचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 16:41 IST

 राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या मिहनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देआश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफीलोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात ठाण्यात आज एल्गार केला. शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आदींबरोबरच शिवसेनेने ठाण्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. ठाण्यातील जनतेच्या मागण्यांसाठी आगामी काळात आणखी उग्र आंदोलने करण्याचा निर्धार आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले.       राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या मिहनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामातील विस्थापित दोन हजार १०० कुटूंबाना कळव्यातच घरे द्यावी, दिवा परिसराला लोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा. तसेच चोरीला जाणार्या सात दशलक्ष लिटर पाणीचोरीची चौकशी करावी, दिवा भागात आरोग्य केंद्र सुरू करावे, दिवा परिसरात बेकायदेशीररित्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार्या ८०० मेट्रिक टन कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने डंपिंग ग्राऊंड तातडीने बंद करावे, अशा मागण्या डावखरे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्र म जाहीर करण्यात आला होता. मुंबई व महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३०० फुटाऐवजी ५०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका देण्याचे जाहीर केले होते. मात्र, या संदर्भात अद्यापि कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, याकडेही_ डावखरे यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली      जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज झालेल्या निदर्शनात माजी खासदार करीट सोमय्या, आमदार संजय केळकर, आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक अ‍ॅड. संदीप लेले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, भरत चव्हाण, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नगरसेविका आशा सिंह, प्रतिभा मढवी, दिपा गावंड, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, कविता पाटील, नंदा पाटील, नम्रता कोळी, महिला आघाडीच्या हर्षला बुबेरा, मनोहर सुगदरे, भाजयुमोचे निलेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास म्हात्रे, जयेंद्र कोळी, राजेश मढवी, दिपक जाधव, सागर भदे, स्वानंद गांगल आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी