शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:24 AM

ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही.

अंबरनाथ - ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही. टाकीतून पुरवठा होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी केला आहे.अंबरनाथसाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम २०१३ मध्ये सुरू झाले. या योजनेतून शहरात नवीन जलवाहिनी टाकणे आणि जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित केले होते. मात्र या कामासाठी झालेल्या विलंबामुळे शहरात पाण्याची आणीबाणी सुरू झाली. उल्हासनदी भरून वाहत असतानाही शहरात मात्र पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नदीतून पाणी उचलण्यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे त्या काळात अतिरीक्त पाणी उचलता येत नाही. मात्र आज उल्हासनदीला नैसर्गिक पाण्याची पातळीच जास्त आहे. त्यामुळे या नदीतून पाणी उचलण्यावर बंधने शिथिल केली आहेत. मात्र असे असले तरी अंबरनाथमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोजगांव,कमलाकरनगर, नारायणनगर, फुलेनगर, गौतमनगर, डीएमसी चाळ या भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच या भागात नव्याने विकसित होणा-या इमारतींनाही पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. याबाबत अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकारीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.अंबरनाथ पश्चिम भागातील पाणी समस्येचे मूळ हे पाण्याचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ बांधून तयार असतानाही ते भरलेले नाही. वर्ष ते दोन वर्ष उलटूनही जलकुंभ भरण्यात येत नसल्याने जुन्याच यंत्रणेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याचे आणि त्यातून लवकरच पाणीपुरवठा केला जाईल असे निदर्शनास येताच राजकीय पक्षांनी श्रेयासाठी धावपळ केली. मात्र आधी पाणी द्या नंतर उद्घाटन करत बसा अशी काँग्रेसने भूमिका घेतल्याने या भागाला पाणी मिळणार नाही यासाठी राजकारण केले जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाºयांना हाताशी धरुन राजकीय दबाव टाकत जलकुंभ सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. दीड वर्ष या भागातील नागरिकांनी पाण्यासाठी त्रास सहन केला आहे. आता या भागातील नागरिकांची संहनशीलता संपत आला आहे. बुधवारपर्यंत पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास पाण्याच्या टाकीवर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.या संदर्भात जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही कल्पना आहे. मात्र तेही या प्रकरणात लक्ष देत नाहीत. अधिकाºयांना निवेदनाची भाषा कळत नसल्याची जाणीव आम्हाला झाली असून त्यांचे कान आणि डोळे उघडतील असे आंदोलन गुरूवारी केले जाईल असा इशारा काँग्रेसने केला आहे.कारणांची जंत्री सादरनागरायणनगर येथील जलकुंभाचे काम होऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र जलवाहिनीच न टाकल्याने हा जलकुंभ सुरू झाला नाही. आधी जलवाहिनीचे आणि नंतर पंप नसल्याचे कारणे पुढे करुन जलकुंभ सुरु केला जात नाही.प्राधिकरणाची उदासीनतापंपाचे काम झाल्यावर या पंपाची चाचणी सुरू असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चाचणी करून जलवाहिनीमधील गळती तपासली जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मूळात ही चाचणी झाल्यावर लागलीच पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र ते कामही प्राधिकरण करत नाही. पुरेसे पाणी असतानाही शहरात टंचाई जाणवत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या