शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरच्या बैठकीनंतरच निर्णय

By admin | Updated: February 9, 2016 02:16 IST

दलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या

- मुरलीधर भवार,  कल्याणदलित चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेवर आधारित ‘जयभीम जयभारत’ या नाटकाला रंगभूमी सेन्सॉर बोर्डाने तात्पुरती मान्यता दिल्याने या नाटकाचा पहिला प्रयोग रविवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पार पडला असला, तरी त्याचे प्रयोग करण्यास मान्यता द्यायची की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. पहिला प्रयोग पाहण्यासाठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांसह काही सदस्य उपस्थित होते. सेन्सॉरने नाटकात काही कट सुचविले होते. पण, ते तसेच ठेवून नाटककाराने प्रयोग सादर केला. मात्र, या नाटकाचे पुढील प्रयोग करायचे की नाही़?, त्याला मान्यता द्यायची की नाही?, याविषयीचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे सांगून त्याविषयी तूर्तास काही भाष्य करणे सेन्सॉरच्या प्रतिनिधींनी टाळले. प्रयोग चांगला झाला, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. जनार्दन जाधव यांनी लिहीलेल्या नाटकाचे रतन बनसोडे त्याचे निर्माते आहेत, तर सूत्रधार सुबोध मोरे आहेत. या नाटकात आंबेडकरांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधतो, अशी रचना असून हा संवाद काल्पनिक आहे. सेन्सॉर बोर्डाकडे नाटकाच्या प्रयोगाची मान्यता घेण्यासाठी आम्ही अर्ज केला, तेव्हा त्यांनी संहितेत १९ कट सुचविले. नाटकातील रमाबाई आंबेडकर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड हे शब्द वगळण्यात यावेत. जातीवाद, हिंदुत्व, नामदेव ढसाळ यांचा गांडू बगीचा, कुत्रा असे शब्द काढण्याची सूचना केली. ‘कुत्र्या’ऐवजी ‘श्वान’ हा शब्द टाकावा. जातीयवादाऐवजी दलितविरोधी, ‘हिंदुत्वा’ऐवजी ‘सत्ता’ असे शब्द वापरण्याची सूचना सेन्सॉरच्या सदस्यांनी केली, अशी माहिती नाटकाचे सूत्रधार मोरे यांनी दिली. नाटकाच्या या प्रयोगाला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सदस्य अशोक समेळ, गिरीश दाबके, प्रसाद ठोसर उपस्थित होते. या नाटकात १९ बदल सुचविणारे लेखी पत्र नाटकाच्या लेखकांना दिले होते. त्यांनी कट मान्य करतो, असे सांगितल्यावर त्यांना प्रयोगाच्या सादरीकरणाची तात्पुरती मान्यता दिली. त्याचा प्रयोग आम्ही पाहिला आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा, हे ठरविण्यासाठी १८ फेब्रुवारीला बोर्डाची बैठक होईल, असे प्रतिनिधींनी सांगितले. प्रयोगाला उपस्थित असलेले भाकपाचे नेते उदय चौधरी म्हणाले, नाटकात सेन्सॉर करण्यासारखे काहीच नाही. ही एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याची चर्चा सध्या होत आहे.ही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबीयापूर्वी ‘जयभीम कॉम्रेड’ हा आनंद पटवर्धन यांचा चित्रपट येऊन गेला आहे. प्रज्ञा लोखंडे यांचे ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक आले आहे. खैरलांजीवर चित्रपट येऊन गेला आहे. ढसाळांच्या गांडू बगीचावर नाटक आलेले आहे. या सगळ्या कलाकृतींना सेन्सॉरचा कोणताही अडसर आला नाही. विवेकानंदांच्या जीवनावर ‘संन्यस्तखड््ग’ हे नाटक आमदार संजय केळकर करतात. हे सगळे चालते. पण, आता सेन्सॉर बोर्डावरील मंडळीच हिंदुत्ववादी असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.