शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:25 IST

बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणीसाठा १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागणार आहेत.एमआयडीसीने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले होते. या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा अडथळा ठरत आहे. धरणाचे हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसी सांगत आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तोंडली मोहघर, काचकोळी, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या गावांतील एक हजार १६३ जणांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्यासाठी घर, शाळा, रस्ते या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून ४६७ जणांची यादी मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप व इतर सुविधा देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत.बारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता २०७.७९ दशलक्ष घनमीटर आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यावर धरणाचा पाणीसाठा १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढून एकूण क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर होणार आहे.पाण्याच्या आरक्षणालाही मान्यताबारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढणार असल्याने या वाढीव पाण्याचे आरक्षण सरकारने मान्य केले आहे. यापैकी १३.७० दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, २३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी केडीएमसीला, ८.४९ दशलक्ष घनमीटर पाणी स्टेम प्राधिकरणास, एमआयडीसीला ८७.९५ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाणार आहे. स्टेम प्राधिकरणाद्वारे ठाण्याला, एमआयडीसीकडून उल्हासनगर, २७ गावे आणि नवी मुंबई, कळवा, ठाणे, मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे बदलापूर, अंबरनाथ विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील नागरिकांना वाढीव पाणी जूननंतर मिळणार आहे.वाढीव पाणी २७ गावे की शहरी भागाला मिळणार?वाढीव २३ दशलक्ष घनमीटर पाणी कल्याण-डोंबिवलीसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे हे पाणी महापालिका २७ गावांना देणार की, शहरी भागासाठी वापरणार, असा प्रश्न आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. २७ गावांना एमआयडीसी आजमितीस दरदिवशी ३० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करते. त्यामुळे एमआयडीसीला आरक्षित केलेल्या ८७.९५ दशलक्ष मीटर पाण्यापैकी किती पाणी २७ गावांना दिले जाईल, याविषयी अद्याप काही सुस्पष्टता नाही.

टॅग्स :Damधरणbadlapurबदलापूर