शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:25 IST

बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणीसाठा १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागणार आहेत.एमआयडीसीने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले होते. या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा अडथळा ठरत आहे. धरणाचे हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसी सांगत आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तोंडली मोहघर, काचकोळी, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या गावांतील एक हजार १६३ जणांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्यासाठी घर, शाळा, रस्ते या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून ४६७ जणांची यादी मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप व इतर सुविधा देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत.बारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता २०७.७९ दशलक्ष घनमीटर आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यावर धरणाचा पाणीसाठा १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढून एकूण क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर होणार आहे.पाण्याच्या आरक्षणालाही मान्यताबारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढणार असल्याने या वाढीव पाण्याचे आरक्षण सरकारने मान्य केले आहे. यापैकी १३.७० दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, २३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी केडीएमसीला, ८.४९ दशलक्ष घनमीटर पाणी स्टेम प्राधिकरणास, एमआयडीसीला ८७.९५ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाणार आहे. स्टेम प्राधिकरणाद्वारे ठाण्याला, एमआयडीसीकडून उल्हासनगर, २७ गावे आणि नवी मुंबई, कळवा, ठाणे, मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे बदलापूर, अंबरनाथ विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील नागरिकांना वाढीव पाणी जूननंतर मिळणार आहे.वाढीव पाणी २७ गावे की शहरी भागाला मिळणार?वाढीव २३ दशलक्ष घनमीटर पाणी कल्याण-डोंबिवलीसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे हे पाणी महापालिका २७ गावांना देणार की, शहरी भागासाठी वापरणार, असा प्रश्न आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. २७ गावांना एमआयडीसी आजमितीस दरदिवशी ३० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करते. त्यामुळे एमआयडीसीला आरक्षित केलेल्या ८७.९५ दशलक्ष मीटर पाण्यापैकी किती पाणी २७ गावांना दिले जाईल, याविषयी अद्याप काही सुस्पष्टता नाही.

टॅग्स :Damधरणbadlapurबदलापूर