शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

‘बारवी’च्या उंचीसाठी पावसाळ्यापर्यंत डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:25 IST

बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम २० वर्षांपासून रखडले आहे. याची दखल घेऊ न राज्य सरकारने एमआयडीसीला पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणीसाठा १३३ दशलक्ष घनमीटरने वाढणार आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागणार आहेत.एमआयडीसीने १९९८ मध्ये धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले होते. या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा अडथळा ठरत आहे. धरणाचे हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एमआयडीसी सांगत आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तोंडली मोहघर, काचकोळी, कोळेवडखळ, सुकाळवाडी, मानिवली या गावांतील एक हजार १६३ जणांचे पुनर्वसन झाले आहे. त्यांच्यासाठी घर, शाळा, रस्ते या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून ४६७ जणांची यादी मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप व इतर सुविधा देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत.बारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता २०७.७९ दशलक्ष घनमीटर आहे. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यावर धरणाचा पाणीसाठा १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढून एकूण क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर होणार आहे.पाण्याच्या आरक्षणालाही मान्यताबारवी धरणाची पाणीसाठ्याची क्षमता १३३.०७ दशलक्ष घनमीटरने वाढणार असल्याने या वाढीव पाण्याचे आरक्षण सरकारने मान्य केले आहे. यापैकी १३.७० दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, २३.५६ दशलक्ष घनमीटर पाणी केडीएमसीला, ८.४९ दशलक्ष घनमीटर पाणी स्टेम प्राधिकरणास, एमआयडीसीला ८७.९५ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाणार आहे. स्टेम प्राधिकरणाद्वारे ठाण्याला, एमआयडीसीकडून उल्हासनगर, २७ गावे आणि नवी मुंबई, कळवा, ठाणे, मीरा-भार्इंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे बदलापूर, अंबरनाथ विभागाला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील नागरिकांना वाढीव पाणी जूननंतर मिळणार आहे.वाढीव पाणी २७ गावे की शहरी भागाला मिळणार?वाढीव २३ दशलक्ष घनमीटर पाणी कल्याण-डोंबिवलीसाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे हे पाणी महापालिका २७ गावांना देणार की, शहरी भागासाठी वापरणार, असा प्रश्न आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. २७ गावांना एमआयडीसी आजमितीस दरदिवशी ३० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करते. त्यामुळे एमआयडीसीला आरक्षित केलेल्या ८७.९५ दशलक्ष मीटर पाण्यापैकी किती पाणी २७ गावांना दिले जाईल, याविषयी अद्याप काही सुस्पष्टता नाही.

टॅग्स :Damधरणbadlapurबदलापूर