शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

coronavirus: ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे कोरोनामुळे तीनतेरा, आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 01:04 IST

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते.

ठाणे -तीन महिन्यांपासून कोरोनाचा सामना करताना आरोग्य विभागातील पदांची गळती झाली आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळामुळे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीचा फटका ठाण्यातील कोरोना रुग्णांना बसला आहे. रूग्णांना वेळेत बेड न मिळणे, अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न येणे, यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे शहरातील चित्र आहे. ही परिस्थिती सुधारून ठाणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते. पालिकाने प्रभाग समितीनिहाय टीम नेमली आहे, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. ही टीमही काहीच काम करत नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात ३० आरोग्य केंदे्र आहेत. यामध्ये ३० हून अधिक वैद्यकीय अधिकारी आहेत. पण, या अधिकाऱ्यांवर सर्व जबाबदारी सोपवल्यामुळे काम करणे कठीण जात आहे. कर्मचारी वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले.ठाण्यात एकूण लोकसंख्या २६ लाख आहे. मात्र, पालिकेचे केवळ ३० आरोग्य केंद्रे कार्यरत असून अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही नाही. या केंद्रातील अधिकाºयाला रुग्णतपासणीपासून कोरोना रुग्णाला रुग्णालय मिळवून देण्यापर्यंतची सर्वच कामे करावी लागत आहेत. यातच वैद्यकीय अधिकाºयांचे दररोज पाच-सहा तास जात असल्यामुळे ते उपचारांच्या सुविधा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने कर्मचाºयांची संख्या वाढवून रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.आपला दवाखाना कागदावरचआपला दवाखाना सुरू करण्याबाबत दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवली. पण, अवघ्या सहा महिन्यांत ती अपयशी ठरूनही आणखी ५० दवाखाने उभारण्याची घोषणा केली. ५० दवाखाने यापूर्वीच योग्य उपाययोजनांसह सुरू केले असते, तर कोरोनाच्या लढ्यात हे खूप उपयुक्त ठरले असते. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका