शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

coronavirus: वैद्यकीय कर्मचारी भरतीला केवळ १५ टक्केच प्रतिसाद, केडीएमसीतील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:08 IST

केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारांच्या घरात गेली असून, त्या तुलनेत मनपाची आरोग्य यंत्रणा थिटी आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय अशा एकूण ८९० पदासांठी भरती प्रक्रिया राबविली. मात्र, आतापर्यंत केवळ १६१ जणच प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. ते पाहता मनपाच्या भरती प्रक्रियेला केवळ १५ टक्केच प्रतिसद मिळाला आहे. परिणामी, उर्वरित ७२९ पदे कशी भरायची, असा पेच प्रशासनापुढे आहे.केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. तसेच मनपा विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड रुग्णालये सुरू करत असून, तेथे डॉक्टर, नर्सची गरज आहे. मनपाकडे एमडी पदवीधारक डॉक्टर नाही. त्यामुळे दोन एमडी डॉक्टरांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यांना पगार कमी असल्याने सुरुवातील दोन लाख तर, नंतर अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. तरीही या पदांना प्रतिसाद मिळालेला नाही. एमबीबीएस १२० डॉक्टर हवे होते. पण, या पदासाठीही कोणीही मुलाखतीसाठी आले नाही.बीएएमएस पदासाठी १२० डॉक्टर हवे होते. पण अवघे १२ डॉक्टर मनपाच्या सेवेत रुजू झाले आहेत. ५८८ नर्सची आवश्यकता असताना केवळ ९७ नर्स कामावर हजर झाल्या आहेत. १४ एक्स रे तंत्रज्ञ हवे असताना १२ जण मिळाले आहेत. फार्मासिस्टच्या १५ च्या १५ जागा भरल्या गेल्या आहेत. नऊ इसीजी तंत्रज्ञांची गरज असताना तिघांनी काम स्वीकारले आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या २४ पैकी २२ जागा भरल्या गेल्या आहेत. मुलाखतीला प्रतिसाद मिळाला असला तरी कोरोनाच्या भीती पोटी अनेकांनी कामावर हजर होण्याची आॅर्डर स्वीकारलेली नाही.७२९ पदांसाठी पुन्हा होणार भरती?कोरोनाकाळात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत केवळ आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. केडीएमसीतील विविध ८९० पदांपैकी केवळ १५ टक्के म्हणजे १६१ पदे भरली गेली आहेत. उर्वरित ७२९ पदांसाठी केडीएमसीला पुन्हा भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.मनपाने १० दिवसांत एक हजार खाटांची व्यवस्था उभारण्याचा दावा केला आहे. तसेच प्रत्येक प्रभागांत किमान ३०० खाटांचे क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून जवळपास २५ हजार खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे या व्यवस्थेसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे.वॉर्डबॉयच्या ८० पदांसाठी १,११३ पात्रभरती प्रक्रियेत केवळ वॉर्डबॉयची भरती अपवाद ठरली आहे. ८० पदांसाठी एक हजार १८९ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एक हजार ११३ जण पात्र ठरले आहेत. त्यामुळे पदसंख्या कमी आणि प्रतिसाद जास्त, असे चित्र पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका