शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनामुळे जोडप्याचे घरातच उरकले शुभमंगल सावधान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:15 IST

मास्क घालून केला विवाह : ज्येष्ठांचे आशीर्वादही ऑनलाइनच

प्रज्ञा म्हात्रे 
 

ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधूवरांना विवाह पुढे ढकलावे लागले; परंतु ठाण्यातील संघवी आणि बाफना कुटुंबाने त्यांच्या मुलांचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच उरकले. त्यानुसार ठाण्याचा वर आणि मुंबईच्या वधूचा घरगुती विवाहसोहळा नुकताच झाला. या घरगुती सोहळ्यादरम्यान वरवधूंनीही मास्क घातले होते.

ठाण्याचा राज संघवी आणि वृषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी २ मे २0२0 ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमंत्रणही देण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता; पण दोन्ही कुटुंबांनी घरातच विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला, असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला असता, तीन लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

लग्नाचे कपडे नसल्याने घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. बाफना कुटुंबातील वृषाली, तिचे आई-वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद या नववधूवरांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले.

लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव व्याहींसमोर मी आधीच ठेवला होता; पण त्यांना धामधुमीत करायचे होते. शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असल्याचे महेंद्र यांनी संघवी सांगितले. सोसायटीतील रहिवाशांनी थाळी वाजवून नवदाम्पत्याचे स्वागत केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न