शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Coronavirus: लॉकडाऊनबाबत संभ्रम कायम; कंटेनमेंट झोनमध्येच अंमलबजावणी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:35 IST

शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात.

ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाही. यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊन, त्या भागाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला होता. त्यानुसार, या काळात शहरात केवळ दूध व मेडिकल दुकानांसह दवाखानेच सुरू राहणार असून उर्वरित सर्वच व्यवहार बंद राहणार होते. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना पुन्हा कठोर निर्बंध कशासाठी, असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केल्यानंतर लॉकडाऊनच्या स्वरुपाबाबत संभ्रम झाला आहे.

काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आजघडीला शहरात आठ हजाराहून अधिक रुग्ण असून, २७७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. झोपडपट्टीपाठोपाठ सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगरसह इतर भागात रुग्ण वाढत आहेत. यामुळे सुरुवातीला ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून तेच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस होती. त्यानुसार, २२ विभागदेखील निश्चित करून तेथील हॉटस्पॉटही निश्चित केले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. त्याऐवजी संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. तीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. मात्र, लॉकडाऊनदरम्यान लोकांची गैरसोय व्हायला नको. किराणा दुकान, भाजीपाला विक्री आदींवर प्रतिबंध न आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायंकाळी केल्या. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरी कशी, असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.अंबरनाथमध्ये लॉकडाऊनला मुदतवाढअंबरनाथ : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अंबरनाथ नगरपालिकेने आधीच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता हा लॉकडाऊन ६ जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने याआधीच सात दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत ३० जूनला संपणार होती.

या लॉकडाऊनमध्ये शहरातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजी आणि फळविक्री हे घरपोच सेवा देणाºयांसाठी सुरू ठेवण्यात आले होते. आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे १ ते ६ जुलैदरम्यानदेखील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. शहरात सर्वच भागात लॉकडाऊन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊनचा निर्णय केवळ विचाराधीन आहे. मग अंशत: किंवा पूर्णपणे लॉकडाऊन करायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कंटेनमेंट झोन आणि रुग्णसंख्या मोठी असलेल्या भागांमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे बंधनकारक राहणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस