शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊनबाबत संभ्रम कायम; कंटेनमेंट झोनमध्येच अंमलबजावणी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:35 IST

शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात.

ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाही. यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊन, त्या भागाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला होता. त्यानुसार, या काळात शहरात केवळ दूध व मेडिकल दुकानांसह दवाखानेच सुरू राहणार असून उर्वरित सर्वच व्यवहार बंद राहणार होते. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना पुन्हा कठोर निर्बंध कशासाठी, असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केल्यानंतर लॉकडाऊनच्या स्वरुपाबाबत संभ्रम झाला आहे.

काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आजघडीला शहरात आठ हजाराहून अधिक रुग्ण असून, २७७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. झोपडपट्टीपाठोपाठ सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगरसह इतर भागात रुग्ण वाढत आहेत. यामुळे सुरुवातीला ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून तेच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस होती. त्यानुसार, २२ विभागदेखील निश्चित करून तेथील हॉटस्पॉटही निश्चित केले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. त्याऐवजी संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. तीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. मात्र, लॉकडाऊनदरम्यान लोकांची गैरसोय व्हायला नको. किराणा दुकान, भाजीपाला विक्री आदींवर प्रतिबंध न आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायंकाळी केल्या. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरी कशी, असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.अंबरनाथमध्ये लॉकडाऊनला मुदतवाढअंबरनाथ : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अंबरनाथ नगरपालिकेने आधीच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता हा लॉकडाऊन ६ जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने याआधीच सात दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत ३० जूनला संपणार होती.

या लॉकडाऊनमध्ये शहरातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजी आणि फळविक्री हे घरपोच सेवा देणाºयांसाठी सुरू ठेवण्यात आले होते. आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे १ ते ६ जुलैदरम्यानदेखील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. शहरात सर्वच भागात लॉकडाऊन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊनचा निर्णय केवळ विचाराधीन आहे. मग अंशत: किंवा पूर्णपणे लॉकडाऊन करायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कंटेनमेंट झोन आणि रुग्णसंख्या मोठी असलेल्या भागांमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे बंधनकारक राहणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस