शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

Coronavirus: लॉकडाऊनबाबत संभ्रम कायम; कंटेनमेंट झोनमध्येच अंमलबजावणी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:35 IST

शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात.

ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाही. यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊन, त्या भागाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला होता. त्यानुसार, या काळात शहरात केवळ दूध व मेडिकल दुकानांसह दवाखानेच सुरू राहणार असून उर्वरित सर्वच व्यवहार बंद राहणार होते. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना पुन्हा कठोर निर्बंध कशासाठी, असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केल्यानंतर लॉकडाऊनच्या स्वरुपाबाबत संभ्रम झाला आहे.

काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आजघडीला शहरात आठ हजाराहून अधिक रुग्ण असून, २७७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. झोपडपट्टीपाठोपाठ सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगरसह इतर भागात रुग्ण वाढत आहेत. यामुळे सुरुवातीला ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून तेच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस होती. त्यानुसार, २२ विभागदेखील निश्चित करून तेथील हॉटस्पॉटही निश्चित केले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. त्याऐवजी संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. तीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. मात्र, लॉकडाऊनदरम्यान लोकांची गैरसोय व्हायला नको. किराणा दुकान, भाजीपाला विक्री आदींवर प्रतिबंध न आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायंकाळी केल्या. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरी कशी, असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.अंबरनाथमध्ये लॉकडाऊनला मुदतवाढअंबरनाथ : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अंबरनाथ नगरपालिकेने आधीच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता हा लॉकडाऊन ६ जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने याआधीच सात दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत ३० जूनला संपणार होती.

या लॉकडाऊनमध्ये शहरातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजी आणि फळविक्री हे घरपोच सेवा देणाºयांसाठी सुरू ठेवण्यात आले होते. आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे १ ते ६ जुलैदरम्यानदेखील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. शहरात सर्वच भागात लॉकडाऊन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊनचा निर्णय केवळ विचाराधीन आहे. मग अंशत: किंवा पूर्णपणे लॉकडाऊन करायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कंटेनमेंट झोन आणि रुग्णसंख्या मोठी असलेल्या भागांमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे बंधनकारक राहणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस