शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

Coronavirus: लॉकडाऊनबाबत संभ्रम कायम; कंटेनमेंट झोनमध्येच अंमलबजावणी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:35 IST

शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात.

ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाही. यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊन, त्या भागाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला होता. त्यानुसार, या काळात शहरात केवळ दूध व मेडिकल दुकानांसह दवाखानेच सुरू राहणार असून उर्वरित सर्वच व्यवहार बंद राहणार होते. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना पुन्हा कठोर निर्बंध कशासाठी, असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केल्यानंतर लॉकडाऊनच्या स्वरुपाबाबत संभ्रम झाला आहे.

काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आजघडीला शहरात आठ हजाराहून अधिक रुग्ण असून, २७७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. झोपडपट्टीपाठोपाठ सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगरसह इतर भागात रुग्ण वाढत आहेत. यामुळे सुरुवातीला ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून तेच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस होती. त्यानुसार, २२ विभागदेखील निश्चित करून तेथील हॉटस्पॉटही निश्चित केले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. त्याऐवजी संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. तीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. मात्र, लॉकडाऊनदरम्यान लोकांची गैरसोय व्हायला नको. किराणा दुकान, भाजीपाला विक्री आदींवर प्रतिबंध न आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायंकाळी केल्या. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरी कशी, असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.अंबरनाथमध्ये लॉकडाऊनला मुदतवाढअंबरनाथ : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अंबरनाथ नगरपालिकेने आधीच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता हा लॉकडाऊन ६ जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने याआधीच सात दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत ३० जूनला संपणार होती.

या लॉकडाऊनमध्ये शहरातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजी आणि फळविक्री हे घरपोच सेवा देणाºयांसाठी सुरू ठेवण्यात आले होते. आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे १ ते ६ जुलैदरम्यानदेखील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. शहरात सर्वच भागात लॉकडाऊन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊनचा निर्णय केवळ विचाराधीन आहे. मग अंशत: किंवा पूर्णपणे लॉकडाऊन करायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कंटेनमेंट झोन आणि रुग्णसंख्या मोठी असलेल्या भागांमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे बंधनकारक राहणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस