शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:42 PM

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप

ठाणे  : ठाणे  महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाचे अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप आता भाजप आणि मनसेने केले आहे. वास्तविक पाहता हे नगरविकास विभागाचे अपयश असून त्यांनी ही जबाबदारी स्विकारणे  अपेक्षित आहे. तसेच ठाण्यातील दोनही मंत्र्यांचे हे अपयश असून त्यांचे मंत्रीपद काढावे असा सुर आता या दोनही पक्षांनी लावला आहे.ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर महापालिका भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली. तर रात्री उशिरा ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु आता यावरुन राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि मनसेने या बदलीच्या निमित्ताने यात उडी घेतली आहे.  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्नी बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणो महापालिका क्षेत्रत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रु ग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक  नारायण पवार यांनी देखील या दोनही मंत्र्यांवर टिका करतांना हे पालिकेला दोष देताना या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेतील काही विशिष्ट अधिका:यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका देखील मावळत्या आयुक्तांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.भाजप पाठोपाठ मनसेने देखील या बदलीवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बदली आड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदली करण्यात आल्या आहेत. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या करण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असतात. याला जबाबदार म्हणून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. नवीन रुग्णालयात साहित्यांचा तुटवडा असे असतांना हे अपयश हे या नेत्यांचे आहे. प्रशासनाच्या माथी मारुन जमणार नाही तर हे अपयश सरकारचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे