शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : अंबरनाथवासीयांचा कोरोनासह पाण्यासाठीही लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:24 IST

अंबरनाथ मध्ये नागरिकांना कोरीना सह पाण्यासाठीही लढा द्यावा लागत आहे .पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ: करणाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झालेली असताना लाखो नागरिक या कोरीनाशी लढा देत आहे. मात्र अंबरनाथ मध्ये नागरिकांना कोरीना सह पाण्यासाठीही लढा द्यावा लागत आहे .पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील  यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचा वॉल खोलून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. सर्व जबाबदारी अधिकार्‍यांची असतानाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून हे काम करण्याची वेळ आली.

संचार बंदीमुळे सर्वच नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे किमान घरातील वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत राहावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे . पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाला सक्षम अधिकारी नसल्याने नागरिकांनी जाब विचारावा कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाण्याचे वितरण करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी जागेवर नसल्याने याप्रकरणाची दखल आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी घेतली. तात्काळ शहरातील राजकीय पक्षांच्या अध्यक्ष सोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. तोरणा वसतिगृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप नाना पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह ही बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी अपुरा पाणीपुरवठा आणि एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या दोन महत्त्वाच्या समस्या बैठकीत उपस्थित केल्या. अंबरनाथ शहरासाठी 5 दशलक्ष लिटर पाणी मंजूर झालेल्या असतानादेखील लघुपाटबंधारे विभाग ते पाणी उचलण्यासाठी एमआयडीसीला आदेश नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अखेर आमदार किणीकर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कायदा हातात घेण्याची तयारी देखील या बैठकीत दर्शविण्यात आली. अधिकारी कागदी आदेशांवर अवलंबून असल्याने त्या आदेशाची वाट न पाहता शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार कीनिकर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी थेट एमआयडीसीच्या जलवाहिनी कडे धाव घेतली.अंबरनाथ फॉरेस्ट नाका वर एमआयडीसीची लाईन ही जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला जोडण्यात आली आहे. त्या ठिकाणचा वॉल खोलून एमआयडीसीचे पाणी थेट अंबरनाथ साठी सोडण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत े काम अधिकार्‍यांनी करणे बंधनकारक होते, ते काम शहरातील राजकीय पक्षांनी आणि आमदारांनी एकत्र येऊन केले आहे. फॉरेस्ट नाका येथील वॉल सोडल्यानंतर लागलीच भेंडी पाडा येथील जलकुंभावर पाणी भरण्यासाठी वॉल खोलण्यात आले.  अशा प्रकारची यंत्रणा अधिकाऱ्यांनी दररोज राबवले नाही तर आम्ही स्वतः ही यंत्रणा चालू असे डॉक्टर किनिकर यांनी स्पष्ट केले.

 एमायडीसी मधील सर्व कंपन्या हे बंद असल्याने त्याठिकाणी जाणारे पाणी हे शहरासाठी देणे गरजेचे आहे असे असतानाही एमायडिसी आर मोठेपणाने हे पाणी अडवत असल्याचा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे

टॅग्स :ambernathअंबरनाथCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwater shortageपाणीकपात