शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कोरोनामुळे २५ दिवसांत ४४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या २२ ते २४ च्या आसपास आहे. एप्रिलमध्ये १७८, तर मे महिन्यात मागील २५ दिवसांत मृतांची संख्या तब्बल ४४२ वर पोहोचली आहे. रुग्णांचे मृत्यू हे केवळ २४ तासांतील नाहीत, असा दावा मनपाकडून केला जात असला तरी मागील काही दिवसांत मृत्यूदर हा १.१९ वरून १.४२ टक्क्यापर्यंत वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एकूण एक लाख ३२ हजार सहा रुग्ण आढळले. एक हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख २७ हजार ३९० इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार ७४० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर मांडला होता. या महिन्यात ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले. तर, ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले. असे असलेतरी १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे महिन्यात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले तरी मृतांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच मृत्यूंची नोंद होत असत; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांची संख्या १३ वर गेली. मे महिन्यात तर दररोज २० ते २३ मृत्यू होत आहेत. २३ मे रोजी आजवरचे सर्वाधिक २४ मृत्यू नोंदले गेले.

दरम्यान, २४ तासांत ज्या कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो, त्यांची संख्या दररोज दिली जाते. सध्या ही संख्या आठ ते नऊच्या आसपास आहे; परंतु जे रुग्ण संशयित म्हणून दाखल होतात आणि नंतर मृत पावतात त्यांचे अहवाल इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) आल्यानंतर त्यांचा समावेश दैनंदिन मृतांच्या आकडेवारीत केला जात असल्याने संख्या वाढल्याचे मनपाचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नोंद होणारे मृत्यू हे मार्च-एप्रिल महिन्यातील आहेत. त्या वेळेला मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यात मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक म्हणजे दिवसाला २० ते २५ इतके होते; परंतु त्याची नोंद त्यावेळी अपुऱ्या माहितीअभावी होऊ न शकल्याने उशिराने म्हणजेच मे महिन्यात ती नोंद होत असल्याचे बोलले जात आहे.

-----------

कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू

- जिल्ह्याचा आढावा घेता कोरोनामुळे होणारे मृत्यू कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठाणे आघाडीवर होते; परंतु दुसऱ्या लाटेत कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू आहेत.

- दीड वर्षात आतापर्यंत एक हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे मनपा हद्दीत एक हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- नवी मुंबईत एक हजार ५६९, मीरा-भाईंदर १,२५४, भिवंडी ४३४, उल्हास नगरमध्ये ४६७, अंबरनाथ ४०३, कुळगाव-बदलापूर २४३ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ८५२ कोरोना मृत्यूंचा समावेश आहे.

-------------