शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
4
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
5
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
6
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
7
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
8
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
9
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
10
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
11
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
12
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
13
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
14
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
15
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
16
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
17
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
18
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
19
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

कोरोनामुळे २५ दिवसांत ४४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या २२ ते २४ च्या आसपास आहे. एप्रिलमध्ये १७८, तर मे महिन्यात मागील २५ दिवसांत मृतांची संख्या तब्बल ४४२ वर पोहोचली आहे. रुग्णांचे मृत्यू हे केवळ २४ तासांतील नाहीत, असा दावा मनपाकडून केला जात असला तरी मागील काही दिवसांत मृत्यूदर हा १.१९ वरून १.४२ टक्क्यापर्यंत वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एकूण एक लाख ३२ हजार सहा रुग्ण आढळले. एक हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख २७ हजार ३९० इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार ७४० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर मांडला होता. या महिन्यात ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले. तर, ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले. असे असलेतरी १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मे महिन्यात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले तरी मृतांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच मृत्यूंची नोंद होत असत; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांची संख्या १३ वर गेली. मे महिन्यात तर दररोज २० ते २३ मृत्यू होत आहेत. २३ मे रोजी आजवरचे सर्वाधिक २४ मृत्यू नोंदले गेले.

दरम्यान, २४ तासांत ज्या कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो, त्यांची संख्या दररोज दिली जाते. सध्या ही संख्या आठ ते नऊच्या आसपास आहे; परंतु जे रुग्ण संशयित म्हणून दाखल होतात आणि नंतर मृत पावतात त्यांचे अहवाल इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) आल्यानंतर त्यांचा समावेश दैनंदिन मृतांच्या आकडेवारीत केला जात असल्याने संख्या वाढल्याचे मनपाचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नोंद होणारे मृत्यू हे मार्च-एप्रिल महिन्यातील आहेत. त्या वेळेला मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यात मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक म्हणजे दिवसाला २० ते २५ इतके होते; परंतु त्याची नोंद त्यावेळी अपुऱ्या माहितीअभावी होऊ न शकल्याने उशिराने म्हणजेच मे महिन्यात ती नोंद होत असल्याचे बोलले जात आहे.

-----------

कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू

- जिल्ह्याचा आढावा घेता कोरोनामुळे होणारे मृत्यू कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठाणे आघाडीवर होते; परंतु दुसऱ्या लाटेत कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू आहेत.

- दीड वर्षात आतापर्यंत एक हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे मनपा हद्दीत एक हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- नवी मुंबईत एक हजार ५६९, मीरा-भाईंदर १,२५४, भिवंडी ४३४, उल्हास नगरमध्ये ४६७, अंबरनाथ ४०३, कुळगाव-बदलापूर २४३ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ८५२ कोरोना मृत्यूंचा समावेश आहे.

-------------