शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:37 AM

वाकण-पाली मार्गावरील पूल : भार पेलण्याची क्षमता ७५ टन; उंची, रुंदी वाढवली

विनोद भोईर

पाली : वाकण-पाली मार्गावरील अंबा नदीवर नवीन पुलाच्या निर्माणाचे काम सुरू झाले आहे. या नवीन पुलाची रुंदी १६ मीटर असून उंची जुन्या पुलापेक्षा पाच ते सहा फूट अधिक होणार आहे आणि भार पेलण्याची क्षमता तब्बल ७५ टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीनपट अधिक असणार आहे. पुलाचे निर्माण काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरून वाहते. या दिवसांत अंबा नदी पुलावरून नेहमी पाणी जाते. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून जातात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. परिणामी पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. नवीन पुलामुळे आता येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे.

पाली-खोपोली मार्गावरील जांभूळपाडा व भालगुल येथील पुलांची दुरवस्था झाली असून ते पूलदेखील धोकादायक झाले आहेत. मात्र या दोन्ही पुलांच्या जागी आता नवीन व अंबा नदी पुलाप्रमाणेच पूल बांधले जाणार आहेत. त्यांचेही काम या आठवडाभरात सुरू होणार असल्याचे एमएसआरडीसी चे उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले. यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरून प्रवास करणे सुखकर होणार आहे. वाकण-पाली खोपोली मार्गावरील हे तिन्ही पूल मुंबई- गोवा महामार्ग व मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाला जोडतात. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. केवळ १९ टन वजन भार पेलण्याची क्षमता असलेल्या या पुलांवरून ६० टनाची वाहतूक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकुवत व धोकादायक होत आहेत. मात्र, आता पाली, जांभूळपाडा व भालगुल येथे नव्याने होणारे पूल हे आधीच्या पुलांपेक्षा पाच ते सहा फूट उंच होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार नाही. या पुलांची क्षमता ७५ टन वजन सहन करण्याची असल्याने बळकटी मिळणार आहे. रुंदीही जास्त असणार आहे. एकाच वेळी वाहने जाऊ शकणार आहेत.तीनही पुलांचे काम नऊ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. सुरुवातीस आठ मीटर रुंदीचे पूल एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर जुने पूल तोडून त्या जागी दुसरे आठ मीटरचे पूल बांधण्यात येतील. दर्जेदार व योग्य वेळेत काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.- सचिन निफाडे,उपअभियंता,एमएसआरडीसीपाली-वाकण मार्गावर अंबा नदीवरील पूल तसेच पाली-खोपोली मार्गावर जांभूळपाडा आणि भालगुल हे तीनही पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. पावसाळ्यात तर पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत असते. त्यामुळे वेळीच नवीन पुलांची निर्मिती होणे गरजेचे होते. सद्य:स्थिती पाली-वाकण मार्गावर अंबा नदी पुलाचे काम सुरू आहे. काही दिवसांनी जांभूळपाडा व भालगुल येथील नवीन पुलांची कामे सुरू होतील, मात्र हे नवीन होणारे पूल दर्जेदार होणे आवश्यक आहे.- सुशील शिंदे,सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस,पाली शहर

टॅग्स :thaneठाणे